शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

अमरावतीत कडक संचारबंदीपूर्वी बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 16:24 IST

Amravati news अमरावती जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ नंतर जिल्ह्यात कडक संचाबंदीचे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून इतवारा बाजारासह शहरातील किराणा दुकानांत एकच गर्दी उसळली.

ठळक मुद्देइतवारा बाजार, किराणा दुकाने तुडूंब

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ नंतर जिल्ह्यात कडक संचाबंदीचे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून इतवारा बाजारासह शहरातील किराणा दुकानांत एकच गर्दी उसळली. एकाही ठिकाणी नियमांचे पालन झाल्याचे दिसून आलेले नाही. ११ वाजतानंतरच्या संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार दिसून आला.

महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने जिल्ह्यात १५ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कित्येक पटीने वाढल्याने आता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी १२ वाजतापासून १५ मेच्या रात्री १२ पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याकालावधीत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी आहे व या आदेशाची कठोर अंंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी बाजारात मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.

शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक किराणा दुकानात सकाळपासून मोठी गर्दी दिसून आली. याशिवाय फळांची दुकाने हातगाड्या, भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मोठी दुकाने काही मॉल्समध्ये पहाटेपासून रांगा दिसून आल्या. या सर्व ठिकाणी लाॅकडाऊनपूर्वी कोरोना प्रतिबंधक नियमाला हरताळ फासल्या गेल्याचे दिसून आल्याने कुठे आहे कोरोना, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

महापालिका क्षेत्रासह तालुक्यांच्या मुख्यालयी असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले. मोठी गर्दी असल्याने दुकानदारांनीही याकडे दुर्लक्ष केले. काही दुकाने दुपारी १२ पर्यंत सुरू असल्याचेही दिसून आले. नागरिकांनी एकच गर्दी केल्याने जयस्तंभ व राजकमल चौकात याशिवाय इतवारा बाजारात वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.

पेट्रोल पंपावरही मोठ्या रांगा

शहरातल्या पेट्रोलपंपावर सकाळपासून नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. संचारबंदीत सर्व काही बंद असताना व नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंधातही पेट्रोलपंपावर एवढी गर्दी का, हा प्रश्न पडला आहे. रविवारी दुपारी बारापर्यंत जीवनावश्यक वस्तूसह पेट्रोलपंप सुरू राहणार असताना नागरिकांनी शनिवारी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसून आले. ‘नो मास्क, नो पेट्रोल’याचाही विसर पडल्याचे दिसून आले.

एटीएमवरही रांगा

बँका, पतसंस्था व पोस्ट ऑफिस दुपारी २ पर्यंतच आठ दिवस सुरू राहणार असल्याने नागरिकांनी शनिवारी एटीएमवर गर्दी केल्याचे दिसून आले.

रविवारी देखील हीच स्थिती राहणार असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणात राहणार आहे. त्यामुळे बँकांनी एटीएममध्ये पुरेशी रोकड भरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ग्राहकांची गौरसोय होणार आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस