शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

अमरावतीत कडक संचारबंदीपूर्वी बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 16:24 IST

Amravati news अमरावती जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ नंतर जिल्ह्यात कडक संचाबंदीचे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून इतवारा बाजारासह शहरातील किराणा दुकानांत एकच गर्दी उसळली.

ठळक मुद्देइतवारा बाजार, किराणा दुकाने तुडूंब

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ नंतर जिल्ह्यात कडक संचाबंदीचे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून इतवारा बाजारासह शहरातील किराणा दुकानांत एकच गर्दी उसळली. एकाही ठिकाणी नियमांचे पालन झाल्याचे दिसून आलेले नाही. ११ वाजतानंतरच्या संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार दिसून आला.

महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने जिल्ह्यात १५ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कित्येक पटीने वाढल्याने आता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी १२ वाजतापासून १५ मेच्या रात्री १२ पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याकालावधीत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी आहे व या आदेशाची कठोर अंंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी बाजारात मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.

शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक किराणा दुकानात सकाळपासून मोठी गर्दी दिसून आली. याशिवाय फळांची दुकाने हातगाड्या, भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मोठी दुकाने काही मॉल्समध्ये पहाटेपासून रांगा दिसून आल्या. या सर्व ठिकाणी लाॅकडाऊनपूर्वी कोरोना प्रतिबंधक नियमाला हरताळ फासल्या गेल्याचे दिसून आल्याने कुठे आहे कोरोना, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

महापालिका क्षेत्रासह तालुक्यांच्या मुख्यालयी असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले. मोठी गर्दी असल्याने दुकानदारांनीही याकडे दुर्लक्ष केले. काही दुकाने दुपारी १२ पर्यंत सुरू असल्याचेही दिसून आले. नागरिकांनी एकच गर्दी केल्याने जयस्तंभ व राजकमल चौकात याशिवाय इतवारा बाजारात वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.

पेट्रोल पंपावरही मोठ्या रांगा

शहरातल्या पेट्रोलपंपावर सकाळपासून नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. संचारबंदीत सर्व काही बंद असताना व नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंधातही पेट्रोलपंपावर एवढी गर्दी का, हा प्रश्न पडला आहे. रविवारी दुपारी बारापर्यंत जीवनावश्यक वस्तूसह पेट्रोलपंप सुरू राहणार असताना नागरिकांनी शनिवारी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसून आले. ‘नो मास्क, नो पेट्रोल’याचाही विसर पडल्याचे दिसून आले.

एटीएमवरही रांगा

बँका, पतसंस्था व पोस्ट ऑफिस दुपारी २ पर्यंतच आठ दिवस सुरू राहणार असल्याने नागरिकांनी शनिवारी एटीएमवर गर्दी केल्याचे दिसून आले.

रविवारी देखील हीच स्थिती राहणार असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणात राहणार आहे. त्यामुळे बँकांनी एटीएममध्ये पुरेशी रोकड भरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ग्राहकांची गौरसोय होणार आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस