शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 16:55 IST

८ कर्मचारी, ४ अधिकारी, १० कैद्यांचे बयाण नोंदविले

ठळक मुद्देचौकशी पूर्ण, अहवालाची प्रतीक्षा

अमरावती :अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या ‘जेलब्रेक’प्रकरणी पाच दिवसांनंतर चौकशी पूर्ण झाली आहे. चाैकशी समितीने कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका ठेवला आहे. दरम्यान ८ सुरक्षा कर्मचारी, ४ अधिकारी आणि १० कैद्यांचे बयाण नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आठवड्यात ही समिती कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याकडे चौकशी अहवाल सादर करणार आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्या नेतृत्वातील चमूने याप्रकरणी चौकशी पूर्ण केली. बराकीचे कुलूप तोडून पलायन करणारे घटनास्थळ, पसार तीनही कैद्यांची हिस्ट्री, बराकीतून बाहेर पडण्याचा मार्ग, छतावर चढण्यासाठी वापरलेले अंथरूण, बराक क्रमांक १२ मधील रात्र पहारेकरी, सुरक्षा रक्षक, सुरक्षा अधिकारी आदी बाबी चौकशी समितीने नमूद केल्या आहेत. २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करून तीन कैदी पसार होण्याकरिता अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कारणीभूत असल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. त्यामुळे येत्या काळात या कारागृहातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई निश्चित केली जाणार आहे.

‘जेलब्रेक’प्रकरणाचा मास्टर माईंड साहिल कालसेकर

अमरावती कारागृहातून साहिल अजमत कालसेकर (३३, नायसी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), सुमित शिवराम धुर्वे (१९) व रोशन गंगाराम उईके (२३, रा. बालापेठ, शेंदुरजनाघाट, ता. वरूड, जि. अमरावती) हे तीन कैदी पसार झाले आहेत. ही मोहीम फत्ते करणारा मास्टर माईंड साहिल कालसेकर असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे रत्नागिरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, घटनेला सहा दिवस लोटूनही पोलिसांंना काहीही सुगावा लागलेला नाही.

जमीं खा गयी या आसमां निगल गया...

पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची गुन्हे शाखा, फ्रेजरपुरा पोलीस, शेंदुरजनाघाट, रत्नागिरी पोलीस तपास करीत आहेत. घटनेच्या सहा दिवसांनंतरही पसार कैदी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले नाही. कारागृहाने स्थापन केलेल्या समितीकडून चौकशी पूर्ण झाली तरी पसार कैदी हाती लागले नाही. त्यामुळे या कैद्यांना जमीं खा गयी या आसमां निगल गया... असे म्हणण्याची वेळ गृह विभागावर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगPoliceपोलिसAmravatiअमरावती