शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Amravati: बीटी बियाणांचा काळाबाजार, कारवाई केव्हा?, कृषी सहायकांच्या उपस्थितीत मिळतात दोन पाकिटे

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 24, 2024 21:59 IST

Amravati News: हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे.

- गजानन मोहोड अमरावती - हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे. शेतकऱ्यांची तक्रार नसल्याने कृषी विभागाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे.

यंदाचा खरीप हंगाम काही दिवसांवर आलेला असल्याने शेतकऱ्यांद्वारा बियाणे, खतांची खरेदी सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांची अधिक मागणी असलेल्या काही बीटी बियाणांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालेला आहे. सदर कंपनीकडे अडीच लाखांवर पाकिटांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर जिल्ह्यासाठी फक्त ६५ हजार पाकिटांचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे व त्यातील काही पुरवठादेखील शहरासह काही तालुक्यांना करण्यात आलेला आहे.मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी व उशिरा झाल्याने व काही दुकानातच पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांच्या अन् कृषी विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अधिकतम शेतकऱ्यांना बियाणे मिळावे, यासाठी एका शेतकऱ्याला दोन बियाणे पाकिटांची विक्री करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर यांनी सांगितले. प्रत्येक केंद्रात कृषी सहायकांची नियुक्तबीटीच्या विशिष्ट वाणांचा तुटवडा असल्याने ज्या ठिकाणी कृषी केंद्रात बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशा केंद्रांमध्ये कृषी सहायकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्यांच्या उपस्थितीत एक शेतकऱ्याला दोन पाकिटांची विक्री करणे सुरू करण्यात आले आहे. अशा दुकानातील अपडेट स्टॉक बोर्डावर नमूद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ग्रामीणमध्ये बियाणांचे दर दामदुप्पटकेंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार बीटी बियाणांच्या पाकिटाची एमआरपी ८६७ रुपये आहे. ग्रामीणमध्ये ९०० ते १२०० रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनाच बियाणांची आवश्यकता असल्याने त्यांच्याद्वारा तक्रार झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे भरारी पथकाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मागणीच्या तुलनेत कमी आवंटन प्राप्त आहे. त्या विशिष्ट वाणाचे बियाणांचा पुरवठा उशिराने झाला व कमी झाला. बियाणे उपलब्ध असलेल्या दुकानात कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या देखरेखीमध्ये विक्री सुरू आहे.- राहुल सातपुतेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व तालुक्यातील भरारी पथकांचा बियाणे विक्रीवर वॉच आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे. शिवाय प्रत्येक दुकानात कृषी सहायक आहेत. बियाणे विक्रीसोबतच लिंकिंग होऊ नये, यावर त्यांचा वॉच आहे.- अजय तळेगावकर, कृषी विकास अधिकारी (जि.प.)

टॅग्स :AmravatiअमरावतीAgriculture Sectorशेती क्षेत्र