शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आमपाटी प्रकल्पाचे दार उघडले; अधिकारी पोहोचले घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:58 IST

आदिवासींनी घाबरू नये, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गांगरखेडा येथे ४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला आमपाटी प्रकल्प फुटण्याच्या भीतीने परिसरात दहशत पसरली होती. लोकमतमध्ये गुरुवारी वृत्त प्रकाशित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्प स्थळी भेट देऊन आदिवासींना हा प्रकार समजावून सांगितला व घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.

गांगरखेडा येथे आमपाटी प्रकल्प मागील दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. जलसंधारण विभागाच्या या कामावर गुणवत्तेचा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला होता. १५ दिवसांपासून मुख्य विमोचकामधून गढूळ पाणी जात असल्याने प्रकल्प फुटण्याची भीती त्यांच्यात पसरली होती. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सहायक अभियंता एन.एस. मावळे व कनिष्ठ अभियंता अंकुश मानकर यांनी तेथे जाऊन आदिवासींसोबत चर्चा केली आणि संपूर्ण परिस्थिती सांगितली.

घाबरू नका, विमोचकातून पाणी सोडले

गुरुवारी धरणाच्या ठिकाणी मुख्य विमोचकाची व १२० मीटर लांब नलिकेच्या आत शिरून पाहणी करण्यात आली. त्यामध्ये अडकलेला गाळ साफ करण्यासाठी मुख्य विमाेचकाचे दार उचलण्यात आले. पाण्याच्या प्रवाहाने तो गाळ निघून गेला. आदिवासींच्या उपस्थितीत सर्व कार्य करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे.

तहसीलदारांनी मागितला लेखी अहवाल

संपूर्ण प्रकरणाचा लेखी अहवाल चिखलदराच्या तहसीलदार माया माने यांनी संबंधित विभागाला मागितला. दुसरीकडे नागरिकांनी कुठल्याच प्रकारे घाबरू नये व प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.

प्रकल्पाच्या गुणवत्तेची अजूनही चर्चा?

गढूळ पाणी निघताच संपूर्ण प्रकल्पाच्या कार्यावरच आदिवासींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे प्रकल्पात नेमका घोटाळा काय झाला किंवा कसे, यावरही आता वेगळी चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीDamधरणAmravatiअमरावती