शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

चिमुकल्यांसह चौघांना एकाचवेळी भडाग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:01 IST

प्रकाश सोनारे हे आपल्या दुचाकीने पत्नी जयश्री व मुले वैष्णवी व आयुष यांना घेऊन चुलत सासऱ्यांच्या तेरवीकरिता निघाले असता, त्यांना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने धडक दिली. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. होत्याचे नव्हते झाले. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

ठळक मुद्देग्रामस्थांना अश्रू अनावर : मालखेडात चूल पेटलीच नाही

वरूड : तालुक्यातील मालखेड येथील सोनारे कुटुंबातील चौघांवर गुरुवारी सायंकाळी शोकविव्हळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सारा गाव उलटला. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सोनारे दाम्पत्य दोन्ही मुलांसह अपघाती दगावल्याची माहिती गावात पोहोचली. सकाळी निघतेवेळी अनेकांना संध्याकाळी येतो, असे सांगून गेलेल्या कुटुंबाचे पार्थिवच घरी पोहोचल्याने गाव हळहळले. एकाही घरातील चूल पेटली नाही.प्रकाश सोनारे हे आपल्या दुचाकीने पत्नी जयश्री व मुले वैष्णवी व आयुष यांना घेऊन चुलत सासऱ्यांच्या तेरवीकरिता निघाले असता, त्यांना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने धडक दिली. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. होत्याचे नव्हते झाले. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. ग्रामस्थांनी रुद्रावतार धारण करून पोलीस यंत्रणेला जाब विचारला. पोलीस अन् ग्रामस्थांमध्ये तूतू-मैमै झाली. चौघांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाहनचालकास आताच अटक करा, असा आग्रह त्यांनी लावून धरला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास चारही मृतदेहांचे शवविच्च्छेदन वरूड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. दुसरीकडे गावात स्मशानशांतता पसरली. एकाचवेळी चार कलेवर पाहून ते स्मशानभूमीत घेऊन जाताना अनेकांचा अश्रुंचा बांध फुटला. दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्ट दु:खसागरात बुडाले. वर्धमनेरी येथील तेरवीचा कार्यक्रम सोडून अनेकांनी मालखेड गाठले. सुमारे ५ ते सहा हजार लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले. प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.सोनारे परिवारावर आघातसायंकाळी परततो, असे सांगून सकाळीच घराबाहेर पडलेले प्रकाश सोनारे, त्यांची पत्नी व दोन मुलांचे पार्थिव पाहून प्रकाश यांचे वृद्ध आई-वडील नि:शब्द झाले. ते शून्यात हरविले. एकाच वेळी मुलगा, सून व नातवांचा मृत्यू त्यांना नि:शब्द करुन गेला. प्रकाशच्या भावांच्या डोळ्यातील अश्रूही थिजले होते.ग्रामस्थांसह नातेवाईकांचा राग अनावरचारचाकी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करा, अन्यथा मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला. वरूड पोलिसांसह शेंदूरजनाघाट, बेनोडा येथून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णलयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशपंत वडस्कर व पोलिसांनी नातेवार्ईकांची समजूत काढली. अखेर दुपारनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू