शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Amravati | कृषीमंत्र्यांचा मुक्काम साद्राबाडीत अन् पाच किमी अंतरावर शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 15:38 IST

अनिल ठाकरेच्या मृत्यूनंतर धारणी येथील रुग्णालयात नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

पंकज लायदे

धारणी (अमरावती) : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी बुधवारी रात्रीपासून मेळघाटातील साद्राबाडी (ता. धारणी) गावात मुक्कामी होते अन् तेथूनच पाच किमी अंतरावर असलेल्या लाकटू गावातील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. 

अनिल सूरजलाल ठाकरे (२५) असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेल्या आदिवासी शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे कर्जाने घेतलेल्या ट्रॅक्टरची मासिक किस्त भरायला पैसे नसल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. 

ना. अब्दुल सत्तार बुधवारी रात्री ११ वाजता साद्राबाडी येथे पोहोचले. गावात एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. वृत्त लिहिस्तोवर ते याच गावात होते. येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर लाकटू गावात ही घटना घडली. अनिल सूरजलाल ठाकरे (२५) हा वडिलोपार्जित दोन हेक्टर शेती वडील व मोठ्या भावासमवेत कसत होता. त्याच शेतीवर खासगी कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. त्याची दरमहा किस्त सुरू होती.

अतिवृष्टीमुळे कपाशीचे पीक पूर्णत: खराब झाल्याने किस्त भरण्याकरिता त्याच्याकडे पैसे नव्हते. दुसरीकडे कृषी विभागाने पिकांचा पंचनामा केलेला नसल्याने नुकसानभरपाईचा पत्ता नव्हता. अशात अनिल बुधवारी सकाळी घरून निघून गेला व धारणी-सुसर्दा मार्गावरील राणापिसा फाट्यावर विषारी औषध प्राशन केले. याची माहिती आई लीलाबाई ठाकरे व पत्नी बिंदा ठाकरे यांना मिळताच दोघींनी पळतच राणापिसा फाटा गाठला. रस्त्यातील वाहनात बसवून सुसर्दा गावातील खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने साद्राबाडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्राथमिक उपचारानंतर त्याच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दिवसभर उपचार करण्यात आले. रात्री दहा वाजता त्याचा मृत्यू झाला.

निलंबनाची मागणी 

अनिल ठाकरेच्या मृत्यूनंतर धारणी येथील रुग्णालयात नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व शेतकरी आत्महत्याला दोषी असलेल्या धारणी येथील कृषी अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेंद्र मालवीय यांनी यावेळी केली. 

शेतकरी आत्महत्येची माहिती मिळाली. कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगून त्याला तात्काळ मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, याकरिता कृषी विभागाच्या ध्येय-धोरणांमध्ये बदलांबाबत सरकार प्रयत्नशील आहे.

- अब्दुल सत्तार, कृषी मंत्री

उंदराचे औषध प्राशन केलेला युवक रुग्णालयात दाखल झाला होता. ती औषधी आतड्यांमध्ये चिकटल्याने त्याच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. 

- जामकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूAbdul Sattarअब्दुल सत्तार