शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

जिल्ह्यात आगडोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 01:02 IST

शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले.

ठळक मुद्देकोट्यवधीचा माल खाक। प्रशासनाकडून आगीबाबत दक्षता घेण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला.डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयापासून २५ मीटर अंतरावर उभ्या ट्रॅव्हल्सला शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आग लागली, तर शनिवारी दुपारी नांदगाव पेठ हद्दीतील सावर्डी स्थित एमआयडीसी परिसरात एका प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली. तिसरी घटना भाजीबाजार परिसरात घडली. एका इमारतीवरील मोबाइल टॉवरजवळील जनरेटरला आग लागली. या तिन्ही घटनांमुळे शहरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले.शॉर्ट सर्कीटने ट्रॅव्हल्सला आगपंचवटी ते वेलकम टी-पॉइंट दरम्यान रोडवर उभ्या ट्रॅव्हल्सला शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आग लागली. यामध्ये ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २७ डी ३९११ जळून खाक झाली. घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पाचारण केले. अग्निशमनने वेळेवर पोहोचवून आग आटोक्यात आणली. त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स पार्किंगची जागा नसतानाही तेथे ट्रॅव्हल्स उभी करण्यात आली होती. यापूर्वी शहरात तीन ट्रॅव्हल्स बसला अज्ञाताने आग लावली होती. त्यापूर्वी कॅम्प मार्गावरील हॉटेल महफीलसमोर तीन कार जळून खाक झाल्या होत्या. या चार महिन्यांत वाहनांना आगी लागल्याच्या घटना सर्वाधिक घडल्याचे स्पष्ट होत आहे.प्लास्टिक कारखान्यानाला आगसावर्डीजवळील बालाजी प्लास्टिक कंपनीला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमनला मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ तीन पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनला जवानांना तब्बल तीन तास अथक परिश्रम घ्यावे लागले. आगीत मोठा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.भाजीबाजार परिसरात जनरेटर भडकलेभाजीबाजार परिसरातील श्री रामचंद्र निवास या सदनिकेवर असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरला शनिवारी दुपारी १.३० वाजता आग लागली. घटनेच्या माहितीवरून अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन सैय्यद अनवर, फायरमन चंद्रकात सूर्यवंशी, दिलीप चौखंडे, अंबाडकर, मकवाने व वाहनचालक अमिन शेख, राजू शेंडे, इम्रान खान, यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे तेथील रहिवासी असलेले १२ कुटुंब धास्तावले होते.अग्निशमन दलाने तिसºया माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहणाºया नागरिकांना घर रिकामे करायला लावले. सिलिंडर बाहेर काढले. दोन तासांनी आग विझली. राजेश गोयनका यांनी २००५ मध्ये सदनिका निर्माण झाले. सदनिकेवर मोबाइल टॉवरला नागरिकांनी विरोध केला होता.वीजतारांच्या स्पर्शाने टिप्पर खाकघुईखेड : चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाºया टिप्परला जिवंत वीजतारांचा स्पर्श झाल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घुईखेड येथे घडली. घुईखेड शिवारातून गौण खनिजाची मांजरखेड (दानापूर) मार्गे ट्रकने ने-आण केली जाते. शनिवारी दुपारी आरजे १९ जीडी १४७० क्रमांकाचा टिप्पर मुरूम खाली करून परत येत असताना अचानक तारांचा स्पर्श झाला. भर उन्हात टिप्परने थेट पेट घेतला.चालक कालुराम याने कसाबसा जीव वाचविला. टिप्पर काही मिनिटामध्येच जळून खाक झाला. सदर ट्रक एनसीसी कंस्ट्रक्शनचा असून, राजस्थानातील आहे.खानापुरात पाच घरे बेचिराखमोर्शी : लगतच्या खानापूर येथे लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. स्पार्किंग झाल्यानंतर गवारीपुरा भागातील रहिवासी बाळू शेंद्रे, गजानन शेंद्रे, अंजनाबाई वाघाडे, दिगंबर शेंद्रे, दिवाकर चौधरी यांची घरे आगीने कवेत घेतली. श्रीनाथ महाराज यांनी मोर्शी येथील अग्निशमन विभागाला माहिती दिली. मोर्शीचे तहसीलदार गणेश माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्तांचे सांत्वन केले. आग विझविण्यासाठी अशोक निमजे, संदीप भदाडे, प्रदीप उमाळे, श्रीकृष्ण ढाकूलकर इत्यादींनी परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोलीस पाटील, तलाठी व खानापूरवासीयांनी मदत केली.

टॅग्स :fireआग