शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेनंतर वृक्ष लागवडीची झाडाझडती, वनसंरक्षकांमार्फत होणार ‘क्राॅस चेकिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:49 IST

युती शासनाच्या काळात १ जुलै ते  ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे.

- गणेश वासनिकअमरावती :  महाविकास आघाडी सरकारने ‘जलयुक्त शिवार’नंतर ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेची झाडाझडती सुरू केली आहे. युती शासनाच्या काळात १ जुलै ते  ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अमरावती प्रादेशिक वनवृत्तात कार्यवाही सुरू असून सहायक वनसंरक्षकांमार्फत  ‘क्रॉस चेकींग’ करून अहवाल मागविण्यात आला आहे.  तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून  ३३ कोटी वृक्ष लागवड ही योजना राबविण्यात आली. या मोहिमेवर ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्रॉफी आदींद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र, नेमके किती वृक्ष जिवंत आहेत, याचे वनविभागाने अंतर्गत मूल्यांकन चालविले आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर ४६ यंत्रणाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली. मात्र, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग वगळता अन्य यंत्रणांनी केलेली वृक्षलागवड केवळ ‘फोटो सेशन’ पुरती मर्यादित होती, असे मूल्यांकनावरून दिसून येते.  

राज्यात अशी झाली होती ३३ कोटी वृक्षलागवडअमरावती - ४२,३६,९००,  अकोला - २८,९६.५००, वाशिम - २२,८३,५००, यवतमाळ - ५८,६४,८५०, बुलडाणा - ३९, ९८,१५०, नाशिक - ६४,९६,०५०, अहमदनगर - ५५,६३,८५०, धुळे - २४,७६.१००, जळगाव - ५४,४३, ९००, नंदुरबार - २४,४४.७००, रत्नागिरी - ३७,६२,९००, सिंधुदुर्ग -२३,५८,९००, रायगड - ४१,४३,३००, पालघर - २८,२०,९५०, मुंबई सिटी - १,३६,२००, पुणे - ७६.०२,८००, सोलापूर - ५४,३२.३५०, सातारा - ६३,७६,७५०, सांगली - ४५,०१,३५०, कोल्हापूर - ५१,४०,४००, औरंगाबाद - ५७,९५,४५०, जालना - ६४.८४,४५०, बीड - ५७,६०,३५०, परभणी - ६४,८५,७५०, हिंगोली - ३१.०८,७००, लातूर- ६,२२,८५०, नांदेड - ५८,६२,२००, गोंदिया - ३१,८१,२५०, चंद्रपूर - ५७,०२,३५० गडचिरोली -२१.८५,९०० भंडारा - २४,४३,८०० अशी जिल्हानिहाय नोंद आहे. 

३३ कोटी वृक्ष लागवडीची पाच निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करावी, असे पत्र मी स्वतः हे ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर दिले होते.  त्यांनी आता जरूर चौकशी करावी. लावण्यात आलेली झाडे सरकारच्या सर्व विभागांनी मिळून लावलेली आहेत, एकट्या वनविभागाने नाही. त्यामुळे सर्वच विभागांची चौकशी करावी लागेल. वन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विकास खारगे, हे आता मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव आहेत. चौकशी सुरू असताना त्यांनादेखील दूर ठेवावे लागेल. निष्पक्षपणे ही चौकशी करावी. त्यासाठी जे सहकार्य लागेल ते मी द्यायला तयार आहे. आम्ही हे ईश्वरीय कार्य म्हणून केले आहे. त्यामुळे चौकशीतून सत्य बाहेर येईल.    - सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री 

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार ३३ कोटी वृक्षलागवडीतील जिवंत रोपांचे मूल्यांकन, उंची तपासली जात आहे. सहायक वनसंरक्षकाना ही जबाबदारी सोपविली असून, ‘क्रॉस चेकिंग’ होत आहे. मूल्यांकन अहवाल प्राप्त होताच वरिष्ठांकडे तो पाठविला जाईल.    - प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र