शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जलयुक्त शिवार योजनेनंतर वृक्ष लागवडीची झाडाझडती, वनसंरक्षकांमार्फत होणार ‘क्राॅस चेकिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:49 IST

युती शासनाच्या काळात १ जुलै ते  ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे.

- गणेश वासनिकअमरावती :  महाविकास आघाडी सरकारने ‘जलयुक्त शिवार’नंतर ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेची झाडाझडती सुरू केली आहे. युती शासनाच्या काळात १ जुलै ते  ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अमरावती प्रादेशिक वनवृत्तात कार्यवाही सुरू असून सहायक वनसंरक्षकांमार्फत  ‘क्रॉस चेकींग’ करून अहवाल मागविण्यात आला आहे.  तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून  ३३ कोटी वृक्ष लागवड ही योजना राबविण्यात आली. या मोहिमेवर ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्रॉफी आदींद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र, नेमके किती वृक्ष जिवंत आहेत, याचे वनविभागाने अंतर्गत मूल्यांकन चालविले आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर ४६ यंत्रणाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली. मात्र, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग वगळता अन्य यंत्रणांनी केलेली वृक्षलागवड केवळ ‘फोटो सेशन’ पुरती मर्यादित होती, असे मूल्यांकनावरून दिसून येते.  

राज्यात अशी झाली होती ३३ कोटी वृक्षलागवडअमरावती - ४२,३६,९००,  अकोला - २८,९६.५००, वाशिम - २२,८३,५००, यवतमाळ - ५८,६४,८५०, बुलडाणा - ३९, ९८,१५०, नाशिक - ६४,९६,०५०, अहमदनगर - ५५,६३,८५०, धुळे - २४,७६.१००, जळगाव - ५४,४३, ९००, नंदुरबार - २४,४४.७००, रत्नागिरी - ३७,६२,९००, सिंधुदुर्ग -२३,५८,९००, रायगड - ४१,४३,३००, पालघर - २८,२०,९५०, मुंबई सिटी - १,३६,२००, पुणे - ७६.०२,८००, सोलापूर - ५४,३२.३५०, सातारा - ६३,७६,७५०, सांगली - ४५,०१,३५०, कोल्हापूर - ५१,४०,४००, औरंगाबाद - ५७,९५,४५०, जालना - ६४.८४,४५०, बीड - ५७,६०,३५०, परभणी - ६४,८५,७५०, हिंगोली - ३१.०८,७००, लातूर- ६,२२,८५०, नांदेड - ५८,६२,२००, गोंदिया - ३१,८१,२५०, चंद्रपूर - ५७,०२,३५० गडचिरोली -२१.८५,९०० भंडारा - २४,४३,८०० अशी जिल्हानिहाय नोंद आहे. 

३३ कोटी वृक्ष लागवडीची पाच निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करावी, असे पत्र मी स्वतः हे ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर दिले होते.  त्यांनी आता जरूर चौकशी करावी. लावण्यात आलेली झाडे सरकारच्या सर्व विभागांनी मिळून लावलेली आहेत, एकट्या वनविभागाने नाही. त्यामुळे सर्वच विभागांची चौकशी करावी लागेल. वन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विकास खारगे, हे आता मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव आहेत. चौकशी सुरू असताना त्यांनादेखील दूर ठेवावे लागेल. निष्पक्षपणे ही चौकशी करावी. त्यासाठी जे सहकार्य लागेल ते मी द्यायला तयार आहे. आम्ही हे ईश्वरीय कार्य म्हणून केले आहे. त्यामुळे चौकशीतून सत्य बाहेर येईल.    - सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री 

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार ३३ कोटी वृक्षलागवडीतील जिवंत रोपांचे मूल्यांकन, उंची तपासली जात आहे. सहायक वनसंरक्षकाना ही जबाबदारी सोपविली असून, ‘क्रॉस चेकिंग’ होत आहे. मूल्यांकन अहवाल प्राप्त होताच वरिष्ठांकडे तो पाठविला जाईल.    - प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र