अखेर तीन ठाणेदारांच्या बदल्या
By Admin | Updated: June 22, 2014 23:45 IST2014-06-22T23:45:43+5:302014-06-22T23:45:43+5:30
शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत तीन पोलीस निरीक्षकांच्या शनिवारी रात्री उशीरा अखेर बदल्या करण्यात आल्यात. शहर कोतवाली, गाडगेनगर व वलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे.

अखेर तीन ठाणेदारांच्या बदल्या
कारवाई : उपायुक्तांचे आदेश, गाडगेनगरचे कुरुलकर नियंत्रण कक्षात
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत तीन पोलीस निरीक्षकांच्या शनिवारी रात्री उशीरा अखेर बदल्या करण्यात आल्यात. शहर कोतवाली, गाडगेनगर व वलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे.
शहर पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी ताकिद दिल्यानंतरही चोरीच्या घटनांवर रोख लागली नाही. या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याची मोठी चर्चा पोलीस वर्तूळात आहे.
कर्तव्यात हयगय करणाऱ्या गुन्हेशाखा, गाडगेनगर, शहर कोतवाली व राजापेठ पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत डीबी स्कॉडच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीशी बजावल्या आहेत.
राजापेठ व गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण सर्वांधिक आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक कुरूलकर आजारी असल्यामुळे ते दीर्घ रजेवर आहेत. या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची गरज लक्षात घेता उपायुक्त संजय लाटकर यांनी शनिवारी तीन पोलीस निरीक्षकांची खांदेपालट केली.
शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक रंजीतकुमार शर्मा यांची बदली वलगाव येथे, गाडगेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक कुरुलकर यांची बदली नियंत्रण कक्षात तर वलगाव पोलीस ठाण्यातचे पोलीस निरीक्षक शिरीष राठोड यांची बदली गाडगेनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या बदल्या प्रशासकीय कारणांवरून करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संजय लाटकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.