शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

नोंदणीकृत दिंड्यांना आषाढीनिमित्त पंढरपुरात प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

जितेंद्रनाथ महाराज, १७ ला जिल्हा कचेरीसमोर भजन आंदोलन अमरावती : वारकरी संप्रदायाची साडेसातशे वर्षांची वारीची परंपरा मुगलांच्या साम्राज्यातदेखील खंडित ...

जितेंद्रनाथ महाराज, १७ ला जिल्हा कचेरीसमोर भजन आंदोलन

अमरावती : वारकरी संप्रदायाची साडेसातशे वर्षांची वारीची परंपरा मुगलांच्या साम्राज्यातदेखील खंडित झाली नाही. परंतु, कोरोनामुळे गतवर्षी आषाढी वारी झाली. यंदाही वारकऱ्यांना मज्जाव करण्याची तुघलकी भूमिका घेतली जात आहे. हा अन्याय असून नोंदणीकृत दिंड्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात यावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विहिंप, बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाकडून १७ जुलै रोजी संपूर्ण विदर्भात भजन आंदोलन होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक जितेंद्रनाथ महाराज यांनी पत्रपरिषदेत दिली.

वारी हा वारकरी संप्रदाय व वारकऱ्यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मुगलांच्या तसेच इंग्रजांच्या काळातही अबाधित होती. गतवर्षी कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली. उपासनेकरिता कधीही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही वा धर्मसत्तेने कधीही राजसत्तेकडे तशी परवानगी मागितली नाही. देशात कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता सामान्य होत आहे. हॉटेल, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी कार्यक्रम सर्रास होत आहेत. त्यात विनामास्क फिरणाऱ्या शेकडोंची गर्दी होत आहे. मग वारकऱ्यांच्या उपासनेच्या मूलभूत अधिकारांवर गदा का आणली जात आहे? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे? कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने शिस्तप्रिय वारकऱ्यांवर का लादली जात आहे, असा सवाल जितेंद्रनाथ महाराजांनी यावेळी केला. १७ जुलै रोजी संपूर्ण विदर्भात भजन आंदोलन करणार आहे. संपूर्ण वारकरी व हिंदू समाज प्रतिवारी निघून विविध मंदिरातून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचतील. तेथे भजन, कीर्तन करून वारीची आठवण म्हणून पांडुरंगाचे झाड लावतील. पुढच्या पिढीला ५०० वर्षांहून अधिक काळातील परंपरा खंडित झाली याची आठवण या वृक्षामुळे व्हावी, हा यामागील उद्देश आहे. आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक जितेंद्रनाथ महाराज, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्यामबाबा निचत, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सदस्य प्रभूजी महाराज मदनकर, हभप शालिकराम खेडकर महाराज आदी उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. यावेळी जनार्दनपंत बोथे, विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष अनिल साहू, श्यामबाबा निचत , विहिंपचे महानगर अध्यक्ष दिनेश सिंग उपस्थित होते.

बॉक्स

या आहेत मागण्या

यावर्षी तुकाराम महाराजांचा ३६० वा पालकी सोहळा आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या मानाच्या १० पालख्यांसोबत ५०० लोकांना पायी वारीची परवानगी द्यावी. त्यासोबत दाखल होणाऱ्या ३५० ते ४०० पालख्यांसोबत किमान तीन ते चार लोकांना वारी करू द्यावी. संक्रमणाचा धोका वाटल्यास वारकरी माळरानात मुक्काम करतील, पण लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना नियम पाळून प्रवासाची परवानगी द्यावी.