शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आदिवासी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; आता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर भर

By गणेश वासनिक | Updated: April 19, 2025 13:20 IST

Amravati : अमरावती विभागाचा पुढाकार; शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांचे २१ ते २९ एप्रिलदरम्यान प्रशिक्षण

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : आदिवासी विद्यार्थी स्पर्धात्मक युगात टिकावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास अमरावती विभागाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्याकरिता शिक्षकांना अगोदर प्रशिक्षित केले जाणार असून २१ ते २९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या कार्यशाळेत येत्या शैक्षणिक वर्षांचे नियोजन तयार केले जाणार आहे. ‘आनंददायी अध्ययन व अध्यापन’ यावर भर देण्यात येणार आहे. अमरावती विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम रावबिला जाणार आहे.

डोंगर, दऱ्या, खोरे आणि वस्ती, वाड्यातील आदिवासी मुलांनी उच्च शिक्षणात झेप घ्यावी. स्पर्धा परीक्षांत सहभाग घेऊन प्रशासकीय सेवेत सहभागी व्हावे, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पायाभरणीवर भर दिला जात आहे. यात इयत्ता पहिली ते चाैथी आणि पाचवी ते १२ वीपर्यंत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश असणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर ‘फोकस’ आहे. आश्रमशाळांमध्ये १०० टक्के उपस्थितीवर भर देण्यात आला आहे. सात एकात्मिक अधिकारी प्रकल्प कार्यालय स्तरावर विषय शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण हाेऊ घातले आहे.

सात प्रकल्पात ३५६१ शिक्षकांचे प्रशिक्षण‘ट्रायबल’च्या अमरावती विभागांतर्गत धारणी, पांढरकवडा, किनवट, कळमनुरी, अकोला, पुसद आणि छत्रपती संभाजीनगर या सात प्रकल्प कार्यालय अधिनस्थ ३५६१ शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्याकरिता वेळापत्रक तयार करण्यात आले असून, तसे आदेश निर्गमित केले आहेत. विज्ञान, गणित, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी या विषय शिक्षकांना प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे.

आदिवासी विकास आयुक्त देणार प्रशिक्षणाला भेटआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसाेड या एका प्रशिक्षण स्थळी स्वत: भेट देणार आहेत. त्यामुळे अमरावती विभागाचे हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मजबूत शैक्षणिक पायाभरणीचे हे मॉडेल भविष्यात इतरही अपर आयुक्त स्तरावर राबविले जाण्याची दाट शक्यता आहे.

"आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र त्यांना योग्य प्लॅटफाॅर्म मिळत नसल्याने ते काहीसे मागे राहतात. आता पहिली ते १२ वीपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्यासह भक्कमपणे पायाभरणीसाठी हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायी ठरेल."- डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री.

टॅग्स :AmravatiअमरावतीEducationशिक्षणTeacherशिक्षक