शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; आता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर भर

By गणेश वासनिक | Updated: April 19, 2025 13:20 IST

Amravati : अमरावती विभागाचा पुढाकार; शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांचे २१ ते २९ एप्रिलदरम्यान प्रशिक्षण

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : आदिवासी विद्यार्थी स्पर्धात्मक युगात टिकावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास अमरावती विभागाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्याकरिता शिक्षकांना अगोदर प्रशिक्षित केले जाणार असून २१ ते २९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या कार्यशाळेत येत्या शैक्षणिक वर्षांचे नियोजन तयार केले जाणार आहे. ‘आनंददायी अध्ययन व अध्यापन’ यावर भर देण्यात येणार आहे. अमरावती विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम रावबिला जाणार आहे.

डोंगर, दऱ्या, खोरे आणि वस्ती, वाड्यातील आदिवासी मुलांनी उच्च शिक्षणात झेप घ्यावी. स्पर्धा परीक्षांत सहभाग घेऊन प्रशासकीय सेवेत सहभागी व्हावे, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पायाभरणीवर भर दिला जात आहे. यात इयत्ता पहिली ते चाैथी आणि पाचवी ते १२ वीपर्यंत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश असणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर ‘फोकस’ आहे. आश्रमशाळांमध्ये १०० टक्के उपस्थितीवर भर देण्यात आला आहे. सात एकात्मिक अधिकारी प्रकल्प कार्यालय स्तरावर विषय शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण हाेऊ घातले आहे.

सात प्रकल्पात ३५६१ शिक्षकांचे प्रशिक्षण‘ट्रायबल’च्या अमरावती विभागांतर्गत धारणी, पांढरकवडा, किनवट, कळमनुरी, अकोला, पुसद आणि छत्रपती संभाजीनगर या सात प्रकल्प कार्यालय अधिनस्थ ३५६१ शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्याकरिता वेळापत्रक तयार करण्यात आले असून, तसे आदेश निर्गमित केले आहेत. विज्ञान, गणित, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी या विषय शिक्षकांना प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे.

आदिवासी विकास आयुक्त देणार प्रशिक्षणाला भेटआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसाेड या एका प्रशिक्षण स्थळी स्वत: भेट देणार आहेत. त्यामुळे अमरावती विभागाचे हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मजबूत शैक्षणिक पायाभरणीचे हे मॉडेल भविष्यात इतरही अपर आयुक्त स्तरावर राबविले जाण्याची दाट शक्यता आहे.

"आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र त्यांना योग्य प्लॅटफाॅर्म मिळत नसल्याने ते काहीसे मागे राहतात. आता पहिली ते १२ वीपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्यासह भक्कमपणे पायाभरणीसाठी हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायी ठरेल."- डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री.

टॅग्स :AmravatiअमरावतीEducationशिक्षणTeacherशिक्षक