शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात शहरात आजपासून कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

अमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात विविध विभागातील अधिकारी, पोलीस अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचे ...

अमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात विविध विभागातील अधिकारी, पोलीस अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचे २० पथकांद्वारा दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत ही धडक मोहीम सुरू राहील. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी सायंकाळी जारी केले.

आदेशानुसार, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांच्या नियंत्रणात राज्य कर निरीक्षक आशिष तिवारी यांचे पथक कोर्ट परिसरात, अन्नधान्य वितरण अधिजकारी परशुराम भोसले यांचे पथक गाडगेबाबा मंदिर परिसरात, सहायक कामगार आयुक्त अनिल कुंटे यांचे पथक भाजीबाजार परिसरात, डीडीआर संदीप जाधव यांचे पथक मोची गल्ली, समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांचे पथक कॉटन मार्केट परिसरात कारवाई करेल.

उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांच्या नियंत्रणात सहायक संचालक कौशल्य विकास प्रफ्फूल शेळके यांचे पथक दस्तुरनगर परिसरात, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गुठळे यांचे पथक रुक्मिणीनगर परिसरात, जलसंधारण विभागाचे रासनकर यांचे पथक इतवारा बाजार परिसरात, उद्योग निरीक्षक जी.बी. सांगळे यांचे पथक जवाहर गेट, सराफा परिसरात, जीएसडीएचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड गुलशन मार्केट परिससरात कारवाई करेल.

उपजिल्हाधिकारी राम लंके यांचे नियंत्रणात एडीटीपी वाघाडे यांचे पथक जवाहर रोड परिसरात, डीपीओ वर्षा भाकरे यांचे पथक रविनगर परिसरात, उद्योग निरीक्षक एन.एन. इंगळे यांचे पथक गांधीनगर परिसरात, एएडीटीपी श्रीकांत पेठकर यांचे पथक मालटेकडी परिसरात, तर उपअभियंता (उर्ध्व वर्धा) द. गो. पवार यांचे पथक नवाथे चौक परिसरात कारवाई करेल.

अमरावतीचे एसडीओ उदयसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात नगर रचनाकार रणजितसिंह तनपुरे यांचे पथक जयस्तंभ चौक परिसरात, एसटीओ सागर मोटघरे यांचे पथक राजकमल चौक परिसरात, एसटीआय रीतेश पिल्ले यांचे पथक इर्विन चौक परिसरात, एसटीआय राजेश राऊत यांचे पथक मालटेकडी परिसरात व एसटीआय मंगेश भोनखाडे यांचे पथक पंचचवटी चौक परिसरात कारवाई करणार आहे.

बॉक्स

अशी राहणार दंडात्मक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये, चेहऱ्यावर मास्क न लावल्यास ५०० रुपये, दुकानामध्ये फिजिकल डिस्टन्सचे पालन नसल्यास व दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फुटांचे अंतर नसल्यास ग्राहकांना ३०० रुपये व दुकानदारांना तीन हजार रुपयांचा दंड राहील. दुकानदारांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास तीन हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय दुसऱ्यांदा महापालिका प्रशासनाद्वारा आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.