एका महिन्यात १४,६३७ वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:57+5:302021-03-13T04:22:57+5:30
अमरावती : शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉईंट लावून तसेच लॉकडाऊमध्ये विनाकारण फिरणाऱ्या १४,६६७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून ...

एका महिन्यात १४,६३७ वाहन चालकांवर कारवाई
अमरावती : शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉईंट लावून तसेच लॉकडाऊमध्ये विनाकारण फिरणाऱ्या १४,६६७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून आतापर्यंत २२,९१,००० रुपयांचा तडजोड शुल्क वाहनचालकांकडून पोलिसांनी वसूल केला. ही कारवाई ७ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान करण्यात आली.
मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळणे, एकत्र जमा होणे तसेच नियमांचे उल्लंघन करणे अशा एकूण ७८० जणांवर भादंविचे कलम १८८ व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविला. कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसून नागरिकांनी नियमांचे पालन करावे तसेच पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी तसेच कोरोनाची लढाई जिंकणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याच्या त्या म्हणाल्या.