शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के गुणवाढप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात.

ठळक मुद्देपाच हजारांचा दंड, सेवापुस्तिकेत नोंद : व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत पुनर्मूल्यांकनात २५ टक्के गुणवाढ होऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली असून, प्रतिपरीक्षक पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने ‘अंडर व्हॅल्यूएशन आणि ओव्हर व्हॅल्यूएशन’ अंतर्गत पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांची २५ टक्के गुणवाढ झाल्यास अशा परीक्षकांवर पाच हजार रुपये दंड आणि त्यांच्या सेवापुस्तिकेत याबाबत नोंद करण्याला सुरुवात केली आहे. हिवाळी २०१८ परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर व्यवस्थित सोडविले असताना, गुण कमी अथवा नापास का झालो, ही विचारणा करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्याकडे एकच गर्दी केली होती.विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांची छायापत्र घेण्याची संधी आहे. त्यावरून हिवाळी २०१८ परीक्षेत २४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ६२५ विद्यार्थ्यांना २५ टक्के गुणवाढ मिळाली होती. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मूल्यांकनात दिरंगाई आणि दुर्लक्षाचा ठपका ठेवत प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशी कारवाई होणार आहे. संबंधित परीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे.विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत २५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्याप्रकरणी कायद्यानुसार ४५० परीक्षकांना कारवाईची नोटीस पाठविली आहे. पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद असे त्याचे स्वरूप आहे.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र