शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

२५ टक्के गुणवाढप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात.

ठळक मुद्देपाच हजारांचा दंड, सेवापुस्तिकेत नोंद : व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत पुनर्मूल्यांकनात २५ टक्के गुणवाढ होऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली असून, प्रतिपरीक्षक पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने ‘अंडर व्हॅल्यूएशन आणि ओव्हर व्हॅल्यूएशन’ अंतर्गत पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांची २५ टक्के गुणवाढ झाल्यास अशा परीक्षकांवर पाच हजार रुपये दंड आणि त्यांच्या सेवापुस्तिकेत याबाबत नोंद करण्याला सुरुवात केली आहे. हिवाळी २०१८ परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर व्यवस्थित सोडविले असताना, गुण कमी अथवा नापास का झालो, ही विचारणा करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्याकडे एकच गर्दी केली होती.विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांची छायापत्र घेण्याची संधी आहे. त्यावरून हिवाळी २०१८ परीक्षेत २४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ६२५ विद्यार्थ्यांना २५ टक्के गुणवाढ मिळाली होती. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मूल्यांकनात दिरंगाई आणि दुर्लक्षाचा ठपका ठेवत प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशी कारवाई होणार आहे. संबंधित परीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे.विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत २५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्याप्रकरणी कायद्यानुसार ४५० परीक्षकांना कारवाईची नोटीस पाठविली आहे. पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद असे त्याचे स्वरूप आहे.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र