शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अमरावतीत २६ गावांत २५ विहिरींचे अधिग्रहण, एका गावात टँकरने पाणी

By जितेंद्र दखने | Updated: March 29, 2024 22:50 IST

१४ पैकी ७ तालुक्यांतील गावांचा समावेश, गैर आदिवासी भागात टँकर

अमरावती : सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. परिणामी, उन्हाचे दाहकतेसोबतच पिण्याच्या पाणीटंचाईची झळ ही ग्रामीण भागात जाणवू लागली आहे. जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्हाभरातील १४ पैकी ७ तालुक्यांमधील २६ गावांत २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर एका गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात दरवर्षी मेळघाटातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावेळी मात्र गैर आदिवासी भाग असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यात पहिला पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर लागला आहे.

यंदा मार्चअखेर ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून मेळघाटातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावात टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय १४ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांतील २६ गावांमध्ये २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा १२ कोटी ६० लाख रुपयांचा आहे. यंदाही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने ३३ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात यंदा ४९३ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. मेळघाटासोबतच चांदूररेल्वे व भातकुली, अमरावती, तिवसा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांतील २६ गावांना सध्या पाणीटंचाईच्या झळ बसत आहेत. यामध्ये सर्वाधिक नांदगाव खंडेश्वर, मोर्शी या दोन तालुक्यांतच प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर अमरावती तालुक्यात पाचपैकी एका गावात बोअरवेल आणि इतर गावांमध्ये खासगी विहिरीद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विहीर अधिग्रहण आणि पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

या गावांची तहान खासगी विहिरींवरभातकुली तालुक्यातील दाढीपेढी, अमरावतीमधील मोगरा, कस्तुरा, भानखेडा बु., पोहरा बंदी, इंदला, घातखेडा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर, नागझरी, पळसमंडळ, मंगररूळ चव्हाळा, वाटपूर, नांदुरा खुर्द, वाढोणा रामनाथ, प्रिंप्री गावंडा, मोर्शीमधील ब्राह्मणवाडा, शिरजगाव भि, गोराळा, पिपरी, दहसूर, गणेशपूर, कोळविहीर, तरोडा (डो.), चिखलदरा तालुक्यातील चुर्णी, चांदूर रेल्वे सावंगी मग्रापूर, तिवसामधील दिनानखेडा आणि चिखली या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीVidarbhaविदर्भWaterपाणी