शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

अमरावतीत २६ गावांत २५ विहिरींचे अधिग्रहण, एका गावात टँकरने पाणी

By जितेंद्र दखने | Updated: March 29, 2024 22:50 IST

१४ पैकी ७ तालुक्यांतील गावांचा समावेश, गैर आदिवासी भागात टँकर

अमरावती : सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. परिणामी, उन्हाचे दाहकतेसोबतच पिण्याच्या पाणीटंचाईची झळ ही ग्रामीण भागात जाणवू लागली आहे. जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्हाभरातील १४ पैकी ७ तालुक्यांमधील २६ गावांत २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर एका गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात दरवर्षी मेळघाटातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावेळी मात्र गैर आदिवासी भाग असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यात पहिला पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर लागला आहे.

यंदा मार्चअखेर ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून मेळघाटातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावात टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय १४ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांतील २६ गावांमध्ये २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा १२ कोटी ६० लाख रुपयांचा आहे. यंदाही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने ३३ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात यंदा ४९३ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. मेळघाटासोबतच चांदूररेल्वे व भातकुली, अमरावती, तिवसा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांतील २६ गावांना सध्या पाणीटंचाईच्या झळ बसत आहेत. यामध्ये सर्वाधिक नांदगाव खंडेश्वर, मोर्शी या दोन तालुक्यांतच प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर अमरावती तालुक्यात पाचपैकी एका गावात बोअरवेल आणि इतर गावांमध्ये खासगी विहिरीद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विहीर अधिग्रहण आणि पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

या गावांची तहान खासगी विहिरींवरभातकुली तालुक्यातील दाढीपेढी, अमरावतीमधील मोगरा, कस्तुरा, भानखेडा बु., पोहरा बंदी, इंदला, घातखेडा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर, नागझरी, पळसमंडळ, मंगररूळ चव्हाळा, वाटपूर, नांदुरा खुर्द, वाढोणा रामनाथ, प्रिंप्री गावंडा, मोर्शीमधील ब्राह्मणवाडा, शिरजगाव भि, गोराळा, पिपरी, दहसूर, गणेशपूर, कोळविहीर, तरोडा (डो.), चिखलदरा तालुक्यातील चुर्णी, चांदूर रेल्वे सावंगी मग्रापूर, तिवसामधील दिनानखेडा आणि चिखली या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीVidarbhaविदर्भWaterपाणी