क्वॉलिटी मॉनिटरिंगसाठी शिकाऊ अभियंत्यांवर धुरा
By Admin | Updated: May 26, 2015 00:12 IST2015-05-26T00:12:38+5:302015-05-26T00:12:38+5:30
मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या ...

क्वॉलिटी मॉनिटरिंगसाठी शिकाऊ अभियंत्यांवर धुरा
आज बैठक : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची करणार तपासणी
अमरावती : मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या जिल्ह्याला टंचाईमुक्त करण्यासोबतच गाव तेथे जलयुक्त शिवार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी २५३ गावाचा कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान या कोट्यवधी रूपयांच्या कामाची गुणवत्ताही राखली जावी, यासाठी या कामांचे मुल्यमापन महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन आणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्ता पूर्ण व्हावीत, यासाठी प्राधान्याने हे अभियंते लक्ष ठेवणार आहेत. ठरावीक कालावधीनंतर या कामांच्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे विविध यंत्रणेच्या माध्यमातूनकेली जात आहे. ही कामे चांगल्या प्रतीची असावीत, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्या दुष्टीने जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा दर आठवडयाला घेण्यात येत आहे. यामध्ये निवड पात्र गावात सुरू असलेल्या कामांचा आढावा कामांची स्थिती याबाबत माहिती घेऊन काही उणिवा आढळल्यास त्यामध्ये सुधारणा करणे व कामे ही वेळेत करण्याच्या दुष्टीने कामांची गती वाढविणे, यावर विशेष भर देत असतांनाच कामांची गुणवत्ता राखणे महत्वाचे आहे. परिणामी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता पडताळण्यासाठी शासकीय अभियांत्रीकी व तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी तसेच तज्ञ प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात दोन या प्रमाणे या अभियंत्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. जिल्हा कायमस्वरूपी टंचाई मुक्त करणे, ही प्रशासनाची भूमिका आहे. ती या अभियानात नक्कीच प्रशासन पूर्ण करेल, यात शंका नाही, असा आशावाद जिल्हाधिकारी गित्ते यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी खास गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन शाखेच्या विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे. यासाठी मंगळवारी बैठक बोलाविली आहे.
- किरण गीत्ते, जिल्हाधिकारी.