शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

आरोपी विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:15 AM

परतवाडा : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर ...

परतवाडा : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर गुरुवारी अचलपूर येथील पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीनवार यांनी सरकारी व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. न्यायालय शुक्रवारी त्यावर निर्णय देणार आहे.

दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. पीसीआरनंतर त्याची ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी अभियोक्ता प्रशांत देशपांडे यांनी अचलपूर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर १९ एप्रिल रोजी सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता भोला चव्हाण व तपास अधिकारी पूनम पाटील यांनी ‘से‘ दाखल केला. त्यानंतर गुरुवारी जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. सहकारी सरकारी अभियोक्ता बी. आर चव्हाण, गोविंद विचोरे यांनी सहकार्य केले.

बॉक्स

जंगल संरक्षण कामासाठी बोलावणे कर्तव्याचा भाग

प्रोटोकॉल नुसार उपवनसंरक्षक जेथे जातो तेथे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना जावे लागते. जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. केवळ कामासंदर्भात विनोद शिवकुमार बोलले, तो कर्तव्याचा भाग आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करावी, असा कुठलाच उद्देश विनोद शिवकुमार यांचा नव्हता, असे मत वकील प्रशांत देशपांडे यांनी मांडले. विनोद शिवकुमार हे कर्तव्यदक्ष व मेहनती अधिकारी होते. दीपाली चव्हाण सांगितलेल्या कामकाजाची माहिती सादर करत नव्हत्या. शिवकुमार सरकारी अधिकारी आहेत. त्यांचे मुख्यालय नागपूर येथे केल्याने पळून जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते वेळोवेळी तपास कामाला मदत करतील. २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, असा युक्तिवाद प्रशांत देशपांडे यांनी केला.

बॉक्स

दीपालीने चिट्टीत लिहिले "मी कंटाळले"

दीपाली चव्हाण यांनी मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत थेट आरोप केले आहेत. त्यामुळे विनोद शिवकुमार यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, ते स्पष्ट होते त्यावरुनच गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी घटना घडताच पळून गेला. अपराधी कृत्य करणे हा सुद्धा ड्युटीचा भाग होऊ शकत नाही. एक वर्षापासून दीपाली चव्हाण यांना त्रास दिला जात होता. त्यामुळेच आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘मी कंटाळले’ असे लिहिले आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता तपास अजून सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयात बसून साक्षीदारांवर दबाव टाकून फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामीन अर्ज खारीज करण्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी अभियोक्ता परिक्षित गणोरकर यांनी न्यायालयात केला.