शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

अबब! मातीचे घर ४५ लाखांचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:30 AM

निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खोपडा येथील घरांच्या मूल्यांकनातील अनियमिततेवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. या घोळाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खोपडा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देखोपडा येथील मूल्यांकन। सीआयडी चौकशीची मागणी, बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खोपडा येथील घरांच्या मूल्यांकनातील अनियमिततेवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. या घोळाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खोपडा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.ग्रामपंचायत सदस्य सचिन वानखडे यांच्या एकाच कुटुंबाच्या घराचे मूल्यांकन १ कोटी १७ लाख रुपये, तर उपसरपंच हरिदास लुंगे यांच्या घराचे मूल्यांकन ५१ लाख ८५ हजार रुपये दाखविले आहे. रोजंदारी कर्मचारी अजिंक्य लुंगे यांचे घर ५७ लाख ८६ हजारांचे दाखविले, तर मातीच्या अन्य घरांचा मोबदला २ ते १० लाखांच्या घरात आहे. मोजक्याच लोकांच्या घरांचे मूल्यांकन अर्धा ते एक कोटीच्या घरात कसे गेले, असा ग्रामस्थांचा रोकडा सवाल आहे. घरांच्या सर्वेक्षणात मूल्यांकन अधिकारी, सरपंच, ग्रामसचिव व सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर घोळ केल्याच्या निषेधार्थ खोपडा येथील ५०० ते ५५० महिला-पुरुषांनी २६ फेब्रुवारीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर प्रशासन हादरले व खोपडा गावातील संपादित घरांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने घरांच्या मूल्यांकनाबाबत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून ग्रामपंचायतला अहवाल प्राप्त झाला. अहवालही सदोषमूल्यांकन अहवालामध्ये घर क्रमांक, घरमालकांचे नाव, घराची किंमत व एकूण रक्कम इतकेच रकाने दर्शविण्यात आले. अहवालात घराचे चौरस क्षेत्रफळ, मातीचे की सिमेंटचे, याची कोणतीही नोंद नाही. कोणत्या दराने घराचे मूल्यांकन केले, याची माहिती अहवालात नाही.दोषींवर व्हावी कारवाईबांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदधिकारी हे सर्व घटक अनियमिततेस जबाबदार असल्याने त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.काय आहे अहवालात?गावातील एका मातीच्या घराचे मूल्यांकन ४५ लाख ६० हजार दाखविले आहे तसेच घर क्रमांक ४३ चे मूल्य दोनवेळा दर्शविले आहे. एका सिमेंटच्या घराचे मूल्य ६२ लाख ३० हजार रुपये दर्शविण्यात आले. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मूल्यांकन अधिकाºयांना हाताशी धरून घरांच्या किमती वाढवून घेतल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.