शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या; नापिकीला कंटाळून विहिरीत घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 10:46 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घटना

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील पांढरी खानापूर येथील अल्पभूधारक शेतकरी विशाल सुभाष मिसार (२७) याने मागासवर्गीय वसतिगृहाच्या मागील भागात महादेवराव पोटे (रा. अंजनगाव) यांच्या शेतातील शंभर फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. २५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.

पोलीस सूत्रांनुसार, विशाल हा अल्पभूधारक शेतकरी असून कुटुंबात दोन एकर शेती आहे. त्याच्या पश्चात आई, बहीण व भाऊ आहे. दिवाळीच्या दिवशी आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता, असे काही नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, महादेवराव पोटे शेतात काम करत असताना त्यांना एक व्यक्ती विहिरीजवळ उभी असल्याचे दिसले. ते पोहोचत नाही तोच विशालने अंगातील टी-शर्ट, चप्पल काढून विहिरीच्या काठावर ठेवली व खोल विहिरीत उडी घेतली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न गावातील नागरिकांनी केला. काही जणांनी विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तो गाळात फसला होता. पांढरी येथील सामाजिक कार्यकर्ते रिंकू करमसिदे, मुन्ना शेख यांनी विहिरीत उतरून मृतदेह काढला. अंजनगाव पोलिसांनी पंचनामा केला.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावतीDeathमृत्यू