शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग; ३७ वर्षांपूर्वीचा तो काळा दिवस

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 19, 2023 18:09 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली, शेतकरी स्वातंत्र्याचा निर्धार

अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी व शेतकरीविरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ रविवारी एक दिवसाचा उपवास करण्यात आला. संयुक्त किसान मोर्चा, आपुलकी परिवार व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाद्वारा हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक जण सहभागी झाले होते.महाष्ट्रात ३७ वर्षांपासून अखंडपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती समजून उपाययोजना करायला पाहिजे होती. दुर्दैवाने तसे झालेले नाही. त्यामुळे नागरिक म्हणून सर्वांची जबाबदारी वाढते. या पार्श्वभूमीवर १९ मार्चचे उपोषण शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणारे ठरले, हे आंदोलन शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करणारे असल्याचे उपस्थितांनी सांगितले. आंदोलनात प्रकाश साबळे, संजय पांडव, प्रमोद कुचे, दिलीप काळे, हरिभाऊ मोहोड, पौर्णिमा सवाई, विजय विल्हेकर, धनंजय काकडे, नितीन पवित्रकार, धनंजय तोटे, नीलेश उभाड, राहुल तायडे, अशिष काळमेघ, मिलिंद वंजारी, किरण महल्ले, अमोल भारसाकळे यांच्यासह अनेक नागरिक व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

१९ मार्च १९८६ ला जाहीर झाली पहिली शेतकरी आत्महत्या

साहेबराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचे शेतकरी होते. शेती परवडत नाही, दरवर्षी तोटाच होतो. म्हणून अस्वस्थ होते, १९ मार्च १९८६ रोजी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवणार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. या घटनेला ३७ वर्षे होतात. म्हणून उपवासासाठी १९ मार्चची तारीख निवडण्यात आल्याचे धनंजय काकडे म्हणाले. 

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावतीYavatmalयवतमाळfarmer suicideशेतकरी आत्महत्या