शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४,८८६ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी ८.८ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांना पूर्वसंमतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती देण्यात येते व त्याच्या ३० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संचउत्पादक कंपनी अथवा प्राधिकृत विक्रेत्यांकडून सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करावी लागेल. जिल्ह्यात २९ फेब्रुवारीअखेर ७८३५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६१२० अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली.

ठळक मुद्देचार दिवसांत पुन्हा १,२३४ प्रस्तावांकरिता २.०५ कोटी प्राप्त

  गजानन मोहोड    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाण्याचा दुरुपयोग रोखण्यात येऊन पाण्याचा योग्यरीतीने वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कृषी आयुक्तालयाकडून याकरिता ८१५.९३ लाखांचा निधी प्राप्त झाला व ४८८६ शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर ८०८.४३ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.  १२३४ प्रस्तावांकरिता २२४.८६ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत १४ डिसेंबरला २०५ लाखांचा निधी प्राप्त झाला व खर्च करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सन २०१८.१९ पर्यंत अनुदान अदायगी प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे कृषी विभागाने सांगितले. शेतकऱ्यांना पूर्वसंमतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती देण्यात येते व त्याच्या ३० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संचउत्पादक कंपनी अथवा प्राधिकृत विक्रेत्यांकडून सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करावी लागेल. जिल्ह्यात २९ फेब्रुवारीअखेर ७८३५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६१२० अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली.

प्रस्तावाला ही कागदपत्रे आवश्यकशेतकऱ्यांना ऑनलाईन प्रस्तावात  पूर्वसंमतिपत्र, सात/बारा उतारा, ८-अ चा उतारा, आधार कार्ड, आधार लिंक बँक पासबूकची सत्यप्रत, कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचनाचा आराखडा, बिलाची मूळ प्रत आदी कागदपत्रे महत्त्वाची आहेत.

योजनेत फेब्रुवारी २०२० अखेर ६१२० अर्ज प्राप्त झाले. त्यातील ६१२० अर्जांना पूर्वसंमती दिली व मोका पाहणी केली. ८०८.४३ लाखांचा निधी जमा करण्यात आला आहे.- विजय चवाळे, एसएओ

शासन योजनेंतर्गत विहीर खोदण्यात आल्यानंतर या योजनेत सूक्ष्म सिंचनासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्याचे अनुदान वर्षभरानंतर का होईना, प्राप्त झाले आहे. - संजय वानखडे, लाभार्थी, शेतकरी

असे मिळते अनुदान

 या योजनेंतर्गत दोन हेक्टर क्षेत्राच्या आतील लाभार्थींना (अल्प व अत्यल्प भूधारक) शेतकरी यांना ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. दोन हेक्टरवरील क्षेत्र असलेले लाभार्थी  व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प