शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

७३, ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव, २० जानेवारीला अमरावती विद्यापीठात आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 5:52 PM

पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावरील परिषद २० जानेवारीला संत गाडगेबाबा विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. 

अमरावती  - पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावरील परिषद २० जानेवारीला संत गाडगेबाबा विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उदघाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या पदाधिकाºयांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. या परिषदेला अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाºयांना निमंत्रित केले आहे. देशाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे महत्त्व ओळखून माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या दूरदृष्टीतून ७३ वी घटनादुरुस्ती झाली. त्यांच्यामुळेच पंचायत राज व्यवस्थेला स्वायत्त संस्था म्हणून स्थान मिळाले. त्यासाठी ६४ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत मांडले गेले. आॅगस्ट १९८९ मध्ये त्याला लोकसभेत मान्यता मिळाली; परंतु राज्यसभेत बहुमत नसल्याने हे विधेयक रखडले होते. सप्टेंबर १९९० मध्ये पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे विधेयक पुन्हा मांडण्यात आले. मात्र, त्यावर चर्चा होण्यापूर्वीच लोकसभा बरखास्त झाली.काँग्रेसचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने पुन्हा सप्टेंबर १९९१ मध्ये हे विधयक तिसºयांदा मांडले व २२ डिसेंबर १९९२ रोजी लोकसभेने, तर २३ डिसेंबर १९९२ ला राज्यसभेने मंजुरी दिली. या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिल्यानंतर २४ एप्रिल १९९३ पासून या दुरुस्तीची अंमलबजावणी देशात सुरू झाली. त्यामुळे ग्रामपंचायतींना मोठी स्वायत्ता मिळाली. ब्रिटिश कालखंडामध्ये नागरी स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा, ही मागणी पुढे आली होती. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात पंतप्रधान राजीव गांधींनीच १९८९ मध्ये नगरपालिकेसंबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते. यानंतर पंतप्रधान व्ही.पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केलेत. मात्र, १९९१ ला पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळातच या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि ३१ मे १९९४ पासून या शिफारशी लागू झाल्या. एकूणच ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठे बळ मिळाले. त्या दृष्टीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागीय परिषद २० जानेवारीला सकाळी १० वाजता डॉ. के.जी. देशमुख सभागृहात आयोजित केली आहे. यासाठी पदाधिका-यांना निमंत्रित केले आहे. त्यांच्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ