शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

६५ पैसेवारीत जिल्ह्याची पीकस्थिती नजरअंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:28 IST

यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देवास्तववादी चित्र नाहीच : हेच का अच्छे दिन, शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्ह्यात १,९८५ गावामधील खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ३० सप्टेंबरला जाहीर केली. यंदाच्या खरिप हंगामात केवळ नांदगाव खंडेश्वर वगळता जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. जिल्ह्यात सरासरी १८१ मिमी पावसाची तूट आहे. मृग नक्षत्रानंतर जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे पिकांची वाढदेखील समाधानकारक झाली. मात्र, सोयाबीवर चक्रीभृंगा, खोडमाशी सह विषानूजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर १० आॅगस्टपासून तब्बल ४५ दिवस पावसात खंड असल्यामुळे सोयाबीन जाग्यावरच विरले. सोयाबीनला फुलोऱ्यावर व शेंगा भरत असताना पावसाची अत्यंत गरज असते. यावर्षी पावसाचा खंड असल्याने सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या. यामुळे सरासरी उत्पादनात किमान ४० टक्के घट येणार आहे. वास्तविकता यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या ७.२८ लाख पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे ३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. सद्यस्थितीत २ लाख हेक्टरवरील सोयाबीन बाधित असताना खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारीत जिल्ह्याची वस्तुस्थिती नजर अंदाज केल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांत अन्याय झाल्याची भावनाकमी पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली होती. मात्र, २१ व २२ सप्टेंबरला आलेल्या पावसामुळे तुरीला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या पैसेवारीमध्ये तूर पिकाची गणना होत नाही. ते पैसेवारीसाठी रबी पीक आहे. कपाशीवर यंदाही बोंडअळीचा अटॅक झालेला आहे. तसेच अपुऱ्या पावसामुळे मूग व उडीद पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याची भावना आहे.तालुकानिहाय नजरअंदाज पैसेवारीजिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात १४४ गावांत ६३ पैसे, भातकुली १३७ गावांत ६७, तिवसा ९५ गावांत ५९, चांदूर रेल्वे ९३ गावांत ५८, धामणगाव रेल्वे ११२ गावांत ६६, नांदगाव खंडेश्वर १६१ गावांत ६६, मोर्शी १५६ गावांत ६१, वरूड १४० गावांत ६८, अचलपूर १८४ गावांत ६८, चांदूरबाजार १७० गावांत ६०, दर्यापूर १५० गावांत ६७, अंजनगाव सुर्जी १२७ गावांत ६९, धारणी १५३ गावांत ६७, तर चिखलदरा तालुक्यात १६३ गावांत ६७ पैसे नजरअंदाज जाहीर करण्यात आलेली आहे.