शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

६५ पैसेवारीत जिल्ह्याची पीकस्थिती नजरअंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:28 IST

यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देवास्तववादी चित्र नाहीच : हेच का अच्छे दिन, शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्ह्यात १,९८५ गावामधील खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ३० सप्टेंबरला जाहीर केली. यंदाच्या खरिप हंगामात केवळ नांदगाव खंडेश्वर वगळता जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. जिल्ह्यात सरासरी १८१ मिमी पावसाची तूट आहे. मृग नक्षत्रानंतर जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे पिकांची वाढदेखील समाधानकारक झाली. मात्र, सोयाबीवर चक्रीभृंगा, खोडमाशी सह विषानूजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर १० आॅगस्टपासून तब्बल ४५ दिवस पावसात खंड असल्यामुळे सोयाबीन जाग्यावरच विरले. सोयाबीनला फुलोऱ्यावर व शेंगा भरत असताना पावसाची अत्यंत गरज असते. यावर्षी पावसाचा खंड असल्याने सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या. यामुळे सरासरी उत्पादनात किमान ४० टक्के घट येणार आहे. वास्तविकता यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या ७.२८ लाख पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे ३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. सद्यस्थितीत २ लाख हेक्टरवरील सोयाबीन बाधित असताना खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारीत जिल्ह्याची वस्तुस्थिती नजर अंदाज केल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांत अन्याय झाल्याची भावनाकमी पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली होती. मात्र, २१ व २२ सप्टेंबरला आलेल्या पावसामुळे तुरीला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या पैसेवारीमध्ये तूर पिकाची गणना होत नाही. ते पैसेवारीसाठी रबी पीक आहे. कपाशीवर यंदाही बोंडअळीचा अटॅक झालेला आहे. तसेच अपुऱ्या पावसामुळे मूग व उडीद पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याची भावना आहे.तालुकानिहाय नजरअंदाज पैसेवारीजिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात १४४ गावांत ६३ पैसे, भातकुली १३७ गावांत ६७, तिवसा ९५ गावांत ५९, चांदूर रेल्वे ९३ गावांत ५८, धामणगाव रेल्वे ११२ गावांत ६६, नांदगाव खंडेश्वर १६१ गावांत ६६, मोर्शी १५६ गावांत ६१, वरूड १४० गावांत ६८, अचलपूर १८४ गावांत ६८, चांदूरबाजार १७० गावांत ६०, दर्यापूर १५० गावांत ६७, अंजनगाव सुर्जी १२७ गावांत ६९, धारणी १५३ गावांत ६७, तर चिखलदरा तालुक्यात १६३ गावांत ६७ पैसे नजरअंदाज जाहीर करण्यात आलेली आहे.