शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

६५ पैसेवारीत जिल्ह्याची पीकस्थिती नजरअंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:28 IST

यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देवास्तववादी चित्र नाहीच : हेच का अच्छे दिन, शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्ह्यात १,९८५ गावामधील खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ३० सप्टेंबरला जाहीर केली. यंदाच्या खरिप हंगामात केवळ नांदगाव खंडेश्वर वगळता जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. जिल्ह्यात सरासरी १८१ मिमी पावसाची तूट आहे. मृग नक्षत्रानंतर जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे पिकांची वाढदेखील समाधानकारक झाली. मात्र, सोयाबीवर चक्रीभृंगा, खोडमाशी सह विषानूजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर १० आॅगस्टपासून तब्बल ४५ दिवस पावसात खंड असल्यामुळे सोयाबीन जाग्यावरच विरले. सोयाबीनला फुलोऱ्यावर व शेंगा भरत असताना पावसाची अत्यंत गरज असते. यावर्षी पावसाचा खंड असल्याने सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या. यामुळे सरासरी उत्पादनात किमान ४० टक्के घट येणार आहे. वास्तविकता यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या ७.२८ लाख पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे ३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. सद्यस्थितीत २ लाख हेक्टरवरील सोयाबीन बाधित असताना खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारीत जिल्ह्याची वस्तुस्थिती नजर अंदाज केल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांत अन्याय झाल्याची भावनाकमी पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली होती. मात्र, २१ व २२ सप्टेंबरला आलेल्या पावसामुळे तुरीला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या पैसेवारीमध्ये तूर पिकाची गणना होत नाही. ते पैसेवारीसाठी रबी पीक आहे. कपाशीवर यंदाही बोंडअळीचा अटॅक झालेला आहे. तसेच अपुऱ्या पावसामुळे मूग व उडीद पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याची भावना आहे.तालुकानिहाय नजरअंदाज पैसेवारीजिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात १४४ गावांत ६३ पैसे, भातकुली १३७ गावांत ६७, तिवसा ९५ गावांत ५९, चांदूर रेल्वे ९३ गावांत ५८, धामणगाव रेल्वे ११२ गावांत ६६, नांदगाव खंडेश्वर १६१ गावांत ६६, मोर्शी १५६ गावांत ६१, वरूड १४० गावांत ६८, अचलपूर १८४ गावांत ६८, चांदूरबाजार १७० गावांत ६०, दर्यापूर १५० गावांत ६७, अंजनगाव सुर्जी १२७ गावांत ६९, धारणी १५३ गावांत ६७, तर चिखलदरा तालुक्यात १६३ गावांत ६७ पैसे नजरअंदाज जाहीर करण्यात आलेली आहे.