शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अमरावतीत पाणी पुरवठ्यांच्या ५७ योजनांमध्ये अपहार, २४ प्रकरणी एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:35 IST

विभागातील जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या ५७ योजनांमध्ये दोन कोटी १६ लाखांचा भ्रष्टाचार झाला असून यापैकी २४ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविभागातील जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या ५७ योजनांमध्ये दोन कोटी १६ लाखांचा भ्रष्टाचार झाला असून यापैकी २४ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ३३ योजनांची चौकशी सुरू आहे, तर आतापर्यंत ४४ लाखांची रक्कम वसूल करण्यात आल्याची बाब पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना सादर अहवालात स्पष्ट झाली आहे.

अमरावती- विभागातील जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या ५७ योजनांमध्ये दोन कोटी १६ लाखांचा भ्रष्टाचार झाला असून यापैकी २४ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ३३ योजनांची चौकशी सुरू आहे, तर आतापर्यंत ४४ लाखांची रक्कम वसूल करण्यात आल्याची बाब पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना सादर अहवालात स्पष्ट झाली आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारण्यासाठी तातडीने करण्यात आलेल्या तात्पुरत्या व पुरक पाणीपुरवठा योजनांमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. कंत्राटदारांनी केलेला अपहार हा अभियंत्यांच्या संगनमताशिवाय झालेला नाही. ग्रामीण भागातील नागरिकांशी निगडित कामे कशी पोखरली जातात, ही ५७ कामे याचीच उदाहरणे आहेत. अपहार झालेल्या सर्वाधिक १६ योजना अकोला जिल्हा परिषदेच्या आहे. या सर्व प्रकरणांत ‘एफआयआर’ दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये अपहाराची रक्कम ८४ लाखांच्या घरात आहे. अमरावती जिल्हा परिषदेत पाच योजनांमध्ये ९ लाखांचा अपहार झाला. यासर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या दोन योजनांमध्ये अपहार झाला. या दोन्ही प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यात २२ योजनांमध्ये ३९ लाखांचा अपहार झाला. यापैकी तीन प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पैकी सात लाखांची रक्कम वसूल करण्यात आली, तर १९ प्रकरणांत चौकशी सुरू आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या १२ पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये ७८ लाखांचा अपहार झाला. यापैकी तीन प्रकरणांत ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला व ३७ लाखांची रक्कम वसूल करण्यात आली. यापैकी नऊ योजनांची चौकशी सुरू असल्याचे जिल्हा परिषदांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषदेच्या ९९ योजना बंदविभागात जिल्हा परिषदेंतर्गत एकूण ४,६८३ ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहेत. यापैकी ४,५८४ योजना कार्यान्वित आहेत, तर ५६ योजना कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. यापैकी ४३ योजना टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुनर्जिवित करण्यात येणार आहेत. मात्र यामध्ये स्वतंत्र ९४ व प्रादेशिकच्या ५ अशा एकूण ९९ योजना कायमस्वरूपी बंद झाल्या आहेत. अर्धवट स्थितीतील ५५६ योजना पूर्ण करण्यासाठी ८५ कोटी ३७ लाखांची गरज आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२.८४ कोटी, अकोला २.४४ कोटी, वाशिम १.८२ कोटी, बुलडाणा २८.२९ कोटी व यवतमाळ जिल्ह्यात १८.३१ कोटींची गरज आहे. 

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती