शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समप्रमाणात गावांच्या वाटपाने सुटला ५६० कोटींचा तिढा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 19:22 IST

समप्रमाणात गावांच्या वाटपाने 560 कोटींचा तिढा सुटला आहे. 

 गजानन मोहोड

अमरावती : बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाच्या याद्या कुणी करायच्या, यावरून रखडलेला शासन निधी वाटपाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. विभागीय आयुक्तांनी या संघटनांसोबत चर्चा करून सुवर्णमध्य साधला आहे. यानुसार समप्रमाणात गावांचे वाटप करण्यात येऊन याद्या तयार करण्यात येणार असल्याने अखेर तिढा सुटला आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्टदरम्यान संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे ३,१३,९०६ शेतकऱ्यांची शेतीपिके बाधित झाली. याबाबत पंचनामे करण्यात आले व शासनाने निकषाचे वाढीव मदत दिली. 

त्यानुसार जिल्ह्यास ५६० कोटी २६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र, मदतनिधी वाटप करण्याच्या याद्या करण्याचे विदर्भ तलाठी संघांद्वारा नाकारण्यात आले. याद्या कृषी विभागाने तयार कराव्या व त्यांच्यामार्फतच वाटप करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रिया रखडली होती. २४ फेब्रुवारी २०१६ च्या शासनादेशानुसार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर महसूल यंत्रणेमार्फत पार पाडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सोबतच जिल्हाधिकारी यांना इतर विभागाच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार आहेत. यानुसार चर्चेत तोडगा निघाल्याने सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना लवकरच शासन मदत मिळणार आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी