शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

समप्रमाणात गावांच्या वाटपाने सुटला ५६० कोटींचा तिढा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 19:22 IST

समप्रमाणात गावांच्या वाटपाने 560 कोटींचा तिढा सुटला आहे. 

 गजानन मोहोड

अमरावती : बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाच्या याद्या कुणी करायच्या, यावरून रखडलेला शासन निधी वाटपाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. विभागीय आयुक्तांनी या संघटनांसोबत चर्चा करून सुवर्णमध्य साधला आहे. यानुसार समप्रमाणात गावांचे वाटप करण्यात येऊन याद्या तयार करण्यात येणार असल्याने अखेर तिढा सुटला आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्टदरम्यान संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे ३,१३,९०६ शेतकऱ्यांची शेतीपिके बाधित झाली. याबाबत पंचनामे करण्यात आले व शासनाने निकषाचे वाढीव मदत दिली. 

त्यानुसार जिल्ह्यास ५६० कोटी २६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र, मदतनिधी वाटप करण्याच्या याद्या करण्याचे विदर्भ तलाठी संघांद्वारा नाकारण्यात आले. याद्या कृषी विभागाने तयार कराव्या व त्यांच्यामार्फतच वाटप करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रिया रखडली होती. २४ फेब्रुवारी २०१६ च्या शासनादेशानुसार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर महसूल यंत्रणेमार्फत पार पाडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सोबतच जिल्हाधिकारी यांना इतर विभागाच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार आहेत. यानुसार चर्चेत तोडगा निघाल्याने सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना लवकरच शासन मदत मिळणार आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी