शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

५६९ मालमत्तांनाच ‘आॅक्युपन्सी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:55 PM

आठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात केवळ ५६९ मालमत्ताधारकांनीच ‘आॅक्युपन्सी’ सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळविल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीर बांधकामांकडे कल : महापालिकेचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : आठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात केवळ ५६९ मालमत्ताधारकांनीच ‘आॅक्युपन्सी’ सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळविल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. याचा अर्थ असा की, भोगवटा प्रमाणपत्र मिळविणाऱ्या या ५६९ मालमत्ताच अधिकृत असून, संपूर्ण शहरातील अन्य मालमत्ता अनधिकृत आहेत.सन १९८६-८७ ते ३० आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ५६९ इमारतींनाच भोेगवटा प्रमाणपत्र दिल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाने स्पष्ट केले आहे.इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती बांधकाम मानकानुसार बांधण्यात आली का, ती राहण्यायोग्य आहे की कसे, यावर संबंधित स्थानिक संस्था भोगवटा प्रमाणपत्र द्यायचे की नाही, हे ठरविते. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीत कुटुंबीयांचे वास्तव्य अनधिकृत ठरते. हे प्रमाणपत्र देताना मंजूर नकाशाप्रमाणे अन्य सर्व निकष पडताळून पाहिले जात असल्याने अनेक जण ते घेणे टाळतात. इमारतींच्या बांधकामानंतर संबंधित मालमत्ता धारकाला भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी ही संबंधित बिल्डर व विकसकांची असते.भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे नेमके काय?इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अभियंता, आरेखक यांनी विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) नुसार कलम ७.६ अंतर्गत इमारत पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (कम्प्लिशन सर्टिफिकेट) नगररचना विभागाकडे सादर करणे गरजेचे आहे. सदर प्रमाणपत्र प्राप्त होताच नगररचना विभागाकडून मंजूर नकाशानुसार इमारतीचे बांधकाम तपासले जाते. कलम ७.७ अन्वये इमारत वापरण्यासाठी योग्य असल्याचे भोगवटा प्रमाणपत्र मनपाकडून मूळ मालकाला दिल्यानंतर या इमारतीचा वापर करता येतो.