शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

दरडोई ५५ लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाचा निर्णय : पाणीपुरवठा योजना सुधारण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२३ पर्यंत ‘हर घर नल से जल’ धोरणाप्रमाणे दरडोई पाणीपुरवठा निकषांत बदल करून ४० लिटरऐवजी ५५ लिटर पाणी घरगुती नळ योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यानुसार सध्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांमध्ये बदल करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्र शासनाचे बदलते धोरण विचारात घेऊन केंद्र शासन व राज्य शासनामार्फत यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील उपांगांचा वापर करून, आवश्यकतेनुसार त्यामध्ये काही बदल करून योजनांची पुन्हा सुधारात्मक जोडणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व वाड्या, वस्त्यांवरील प्रत्येक कुटुंबाला टप्प्याटप्प्याने वैयक्तिक नळाद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यांनी जे वार्षिक कृती आराखडे तयार केले आहेत, त्यात अशा वैयक्तिक नळ जोडणीसाठी सूचना करीत असताना, अस्तित्वातील योजना सक्षम असल्यास पम्पिंग तास वाढविणे, गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या वितरण वाहिन्या वाढविण्यास विविध उपाययोजना सुचविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यता आहे.घरगुती नळ जोडणीचे दर निश्चितग्रामीण पाणीपुरवठा योजनाद्वारे दिल्या जाणाऱ्या नळजोडणीचे दर निश्चित केले आले असून, पीव्हीसी पाईपचा कनेक्शनचा प्रतिजोडणी दर १७२१ रुपये, तर रस्ता ओलांडून नळ द्यावयाचा असल्यास २,६६८ रुपये निश्चित केला आहे. यामध्ये जलमापक (मीटर) चा समावेश करण्यात आलेला नाही.जलजीवन मिशन अंतर्गत उपक्रमासाठी पाणीपुरवठा विभागाने नियोजन सुरू केले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

टॅग्स :Waterपाणी