शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

दरडोई ५५ लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाचा निर्णय : पाणीपुरवठा योजना सुधारण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२३ पर्यंत ‘हर घर नल से जल’ धोरणाप्रमाणे दरडोई पाणीपुरवठा निकषांत बदल करून ४० लिटरऐवजी ५५ लिटर पाणी घरगुती नळ योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यानुसार सध्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांमध्ये बदल करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्र शासनाचे बदलते धोरण विचारात घेऊन केंद्र शासन व राज्य शासनामार्फत यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील उपांगांचा वापर करून, आवश्यकतेनुसार त्यामध्ये काही बदल करून योजनांची पुन्हा सुधारात्मक जोडणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व वाड्या, वस्त्यांवरील प्रत्येक कुटुंबाला टप्प्याटप्प्याने वैयक्तिक नळाद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यांनी जे वार्षिक कृती आराखडे तयार केले आहेत, त्यात अशा वैयक्तिक नळ जोडणीसाठी सूचना करीत असताना, अस्तित्वातील योजना सक्षम असल्यास पम्पिंग तास वाढविणे, गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या वितरण वाहिन्या वाढविण्यास विविध उपाययोजना सुचविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यता आहे.घरगुती नळ जोडणीचे दर निश्चितग्रामीण पाणीपुरवठा योजनाद्वारे दिल्या जाणाऱ्या नळजोडणीचे दर निश्चित केले आले असून, पीव्हीसी पाईपचा कनेक्शनचा प्रतिजोडणी दर १७२१ रुपये, तर रस्ता ओलांडून नळ द्यावयाचा असल्यास २,६६८ रुपये निश्चित केला आहे. यामध्ये जलमापक (मीटर) चा समावेश करण्यात आलेला नाही.जलजीवन मिशन अंतर्गत उपक्रमासाठी पाणीपुरवठा विभागाने नियोजन सुरू केले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

टॅग्स :Waterपाणी