शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:51 IST

Amaravati : सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षीच्या कपाशी सोयाबीनला भाव न मिळाल्याने भावांतर योजनेच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,८४,५४४ शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे ई-केवायसी केली असल्याने त्यांच्या खात्यात पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने अर्थसाहाय जमा होत आहे. त्यामुळे सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेतमालास हमीभावदेखील मिळाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने भावांतर योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजार देण्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी दोन दिवसांपासून सुरू झालेली आहे. गतवर्षी ई-पीक पाहणी केलेल्या ३,५३,६८३ शेतकऱ्यांच्या याद्या जमाबंदी विभागाने कृषी विभागाला पुरविल्या होत्या व यामध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे. शासनाद्वारा २९ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अर्थसाहाय्य जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया ३० पासून सुरू झाली आहे. अद्याप ४६,२४६ शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया केली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

याद्या प्राप्त शेतकरी : ३,५३,६८३ कपाशीकरिता टार्गेट : १,५२,३४२ सोयाबीनसाठी टार्गेट : २,०१,३४१ आतापर्यंत केवायसी : १,८४,५४४ ई-केवायसी प्रलंबित : ४६.२४६

अर्थसाहाय मिळालेले तालुकानिहाय शेतकरी अचलपूर १०,६५३, अमरावती २२,८६४, अंजनगाव सुर्जी १६,२४६, भातकुली १४,४०५, चांदूर रेल्वे १३,०८१, चांदूर बाजार १४,८१६, चिखलदरा ४,९०१, दर्यापूर १९,८७५, धामणगाव रेल्वे १२,३४४, धारणी ६,६४४, मोर्शी १५,९६६, नांदगाव खंडेश्वर १९,८७२, तिवसा १३,३६५, व वरूड तालुक्यात ९५१२ शेतकऱ्यांना अर्थसाहाय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती