अपघात विम्यात शेतकऱ्यांना ४४ लाख
By Admin | Updated: March 18, 2015 00:23 IST2015-03-18T00:23:34+5:302015-03-18T00:23:34+5:30
शासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत

अपघात विम्यात शेतकऱ्यांना ४४ लाख
लोकमत विशेष
गजानन मोहोड अमरावती
शासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २०१३-१४ मध्ये प्राप्त झालेल्या ७१ पैकी ४४ प्रकरणांत शेतकरी परिवाराला ४४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. १० मार्च २०१५ अखेर २१ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.
कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे निकामी झाल्यास किंवा एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते.
अमरावती विभागात कृषी विभागाचे अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत. अमरावती उपविभागात अपघातग्रस्त ३६ प्रकरणे दाखल करण्यात आली यापैकी २४ प्रकरणे विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आली. ४ प्रकरणे नामंजूर तर ८ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत, मोर्शी उपविभागात २६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली. विमा कंपनीद्वारा १६ प्रकरणे मंजुर करण्यात आली. १ प्रस्ताव नाकारला, ९ प्रकरणे प्रलंबित असून २६ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
अचलपूर उपविभागात ९ अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली.
काय आहे शेतकरी जनता विमा योजना?
शेती व्यवसाय करतांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, शॉक लागणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते त्या परीवाराला उदरनिर्वाहासाठी आर्र्थीक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २००४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली, याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नाव देण्यात आले आहे.