शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:44 AM

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

ठळक मुद्देयंदा मान्सूनच्या पावसाचे आगमन लवकर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

संदीप मानकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती:  पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा १ जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहचला आणि स्थिरस्थावर झाला. त्या कारणाने यंदा विदर्भातही १० जूननंतर दमदार पावसाची आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ४८.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३०.०२ टक्के, अरुणावती सर्वात कमी ९.७८ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ४०.०५ टक्के, वान ४४.५५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४९.३९ टक्के, पेनटाकळी ४१.८२ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात १६.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ५६५.१८ दलघमी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.२४ मध्यम प्रकल्पांत फक्त ३५ टक्केच पाणीसाठामोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी फक्त ३५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु पावसाळा दोन आठवड्यावर येऊन ठेपल्याने यंदा प्रकल्प पुन्हा शंभर टक्के भरतील अशी अपेक्षा आहे. गत वर्षी बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्याकारणाने प्रकल्पातून रबीला सिंचनाकरिता पाणी देता आले. ४७७ लघु प्रकल्पांत मात्र २०.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून पाचही जिल्ह्यांतील एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी ३२.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद सिंचन विभागाने घेतली आहे.

टॅग्स :Waterपाणी