शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

३६८ पुरूष ठरले कौटुंबिक अत्याचाराचे बळी

By admin | Updated: January 24, 2016 00:16 IST

समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे.

नवरोबा बेपत्ता : पुरूषांसाठीही राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची मागणी मोहन राऊ त धामणगाव रेल्वे समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे. कुटुंबात पती-पत्नी ही संसाराची दोन चाके होत. गाडा हाकत असताना भविष्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. दरम्यान, मोठी कसरत करावी लागते़ सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुलगा तथा मुलगी लहान असताना मुलांना इंजिनिअर, डॉक्टर करणे तसेच मोठ्या हुद्यावर नोकरी लागण्याचे स्वप्न पाहतात़ यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची या जन्मदात्यांची तयारी असते़ परंतु वाढत्या महागाईत जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्वप्ने अर्ध्यावर तुटतात़ अशातच विविध कारणांवरून पती-पत्नीत वाद निर्माण होतात. यासोबतच एकमेकांविषयी द्वेष उत्पन्न झाल्याने पत्नी किंवा पती आत्महत्यासारखा चुकीचा पर्याय निवडला जातो़ यात महिलांची संख्या अधिक प्रमाणात असली तरी पुरूष झालेल्या तक्रारीवरून बळी पडतो़ धामणगाव तालुक्यात मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, दत्तापूर या पोलीस ठाण्यासह तालुक्यातील काही गावांची हद्द चांदूररेल्वे व कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते़ मिळालेल्या पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीवरून पती-पत्नीत वाद झाल्याने अनेक तक्रारीत पतीवर गुन्हा दाखल करण्याचे प्रकार मागील पाच वर्षांत घडले आहे़ पती घरी नसताना पत्नीने जाळून तथा विष घेऊन आत्महत्या केली असली तरी संब्ांधित पुरूषाविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे आकडेवारीवरून पहावयास मिळत आहे़ मागील पाच वर्षांत कौटुंबिक कलहातून आत्महत्या झाल्यामुळे ३६८ पुरूष या कौटुंबिक हिंसेचे बळी पडले आहे़ दररोज कौटुंबिक वाढता कलह पाहता ३४ नवरोबा कुटुंब सोडून गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ महिलांची आत्महत्या ही कुटुंब कलहातून झाली असल्याने संबंधित पती हा कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही स्वाभाविक बाब आहे़ परंतु अशा कारणाची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचे या प्रकरणाला बळी पडलेल्या पुरूषांची मागणी आहे़ पुरुषांसाठी आयोग स्थापन करा मागील अनेक वर्षांपासून महिलांवर अत्याचार होत असल्याने शासनाने कठोर कायदा अस्तित्वात आणला़ त्यामुळे महिलांना संरक्षण मिळाले़ आजही महिलांची छळवणूक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येतात़ परंतु या सर्व बाबींना संबंधित पुरूष किती जबाबदार आहे़, या बाबीची कारणमीमांसा शोधणे गरजेचे आहे. पुरूषांसाठी हे राष्ट्रीय आयोग स्थापन करावे, अशी मागणी जोर धरत आहे़