शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

३६८ पुरूष ठरले कौटुंबिक अत्याचाराचे बळी

By admin | Updated: January 24, 2016 00:16 IST

समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे.

नवरोबा बेपत्ता : पुरूषांसाठीही राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची मागणी मोहन राऊ त धामणगाव रेल्वे समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे. कुटुंबात पती-पत्नी ही संसाराची दोन चाके होत. गाडा हाकत असताना भविष्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. दरम्यान, मोठी कसरत करावी लागते़ सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुलगा तथा मुलगी लहान असताना मुलांना इंजिनिअर, डॉक्टर करणे तसेच मोठ्या हुद्यावर नोकरी लागण्याचे स्वप्न पाहतात़ यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची या जन्मदात्यांची तयारी असते़ परंतु वाढत्या महागाईत जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्वप्ने अर्ध्यावर तुटतात़ अशातच विविध कारणांवरून पती-पत्नीत वाद निर्माण होतात. यासोबतच एकमेकांविषयी द्वेष उत्पन्न झाल्याने पत्नी किंवा पती आत्महत्यासारखा चुकीचा पर्याय निवडला जातो़ यात महिलांची संख्या अधिक प्रमाणात असली तरी पुरूष झालेल्या तक्रारीवरून बळी पडतो़ धामणगाव तालुक्यात मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, दत्तापूर या पोलीस ठाण्यासह तालुक्यातील काही गावांची हद्द चांदूररेल्वे व कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते़ मिळालेल्या पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीवरून पती-पत्नीत वाद झाल्याने अनेक तक्रारीत पतीवर गुन्हा दाखल करण्याचे प्रकार मागील पाच वर्षांत घडले आहे़ पती घरी नसताना पत्नीने जाळून तथा विष घेऊन आत्महत्या केली असली तरी संब्ांधित पुरूषाविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे आकडेवारीवरून पहावयास मिळत आहे़ मागील पाच वर्षांत कौटुंबिक कलहातून आत्महत्या झाल्यामुळे ३६८ पुरूष या कौटुंबिक हिंसेचे बळी पडले आहे़ दररोज कौटुंबिक वाढता कलह पाहता ३४ नवरोबा कुटुंब सोडून गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ महिलांची आत्महत्या ही कुटुंब कलहातून झाली असल्याने संबंधित पती हा कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही स्वाभाविक बाब आहे़ परंतु अशा कारणाची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचे या प्रकरणाला बळी पडलेल्या पुरूषांची मागणी आहे़ पुरुषांसाठी आयोग स्थापन करा मागील अनेक वर्षांपासून महिलांवर अत्याचार होत असल्याने शासनाने कठोर कायदा अस्तित्वात आणला़ त्यामुळे महिलांना संरक्षण मिळाले़ आजही महिलांची छळवणूक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येतात़ परंतु या सर्व बाबींना संबंधित पुरूष किती जबाबदार आहे़, या बाबीची कारणमीमांसा शोधणे गरजेचे आहे. पुरूषांसाठी हे राष्ट्रीय आयोग स्थापन करावे, अशी मागणी जोर धरत आहे़