शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 12:16 IST

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विभागातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.

ठळक मुद्देधोक्याची घंटा पावसाळ्याचे दोन महिन्यानंतरही ४९ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विभागातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. बुलडाणा जिल्ह्याची स्थिती गंभीर असूून, भर पावसाळ्यात ४९ टँंकरने ४८ गावांना पाणीपुरवठा होत आहे. विभागातील ४९९ जलप्रकल्पांत केवळ ४० टक्के साठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहीत धरल्यास आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.अमरावती विभागात १ जून ते १ आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत पावसाची सरासरी ४२९.५ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३९३ मिमी पाऊस पडला. ही ९१.५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेला २८९ मिमी पावसाची नोंद होती. सलग चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने भूजलस्तर मोठ्या प्रमाणावर खालावला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात आज तारखेपर्यंत २८९.४ मिमी पाऊस झाला. ही ९१ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात २९१.९ मिमी पाऊस झाला. ही १२२.८ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३२८.९ मिमी पावासाची नोंद झाली. ही ९६ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३२९ मिमी पाऊस झाला. ही ७२ टक्केवारी आहे, तर वाशिम जिल्ह्यात ३७५ मिमी पाऊस झाला. ही १३० टक्केवारी आहे. विभागात सर्वात कमी पाऊस बुलडाणा जिल्ह्यात झाल्यामुळे अद्यापही ४८ गावांमध्ये ४९ टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यातील ११ तालुके, अकोला २, यवतमाळ ९ तर बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच १३ ही तालुके पावसात माघारली आहेत. पावसाचे आता ५९ दिवस बाकी आहेत व हवामानतज्ञांच्या माहितीनुसार आॅगस्टच्या ८ ते १० तारखेपर्यंत अशीच स्थिती कायम राहणार असल्यामुळे आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

४९९ प्रकल्पांत ४० टक्केच साठाविभागात एकूण ४९९ जलप्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४०.११ टक्के साठा आहे. त्यातही १० टक्के 'डेडवॉटर' असल्याने प्रत्यक्ष ३० टक्केच साठा असल्याचे वास्तव आहे.  बुलडाणा जिल्ह्यात पेनटाकळी प्रकल्पात ४.८७ टक्के, नळगंगा १०.१६, ज्ञानगंगा १६.९२, पलढग, १२.५, मन १५.९४, तोरणा ८.३७, तोरणा ८.३७ व उतावली प्रकल्पात १७.२३ टक्के साठा आहे.५ आॅगस्टपर्यंत पावसाची उघडीपहवामानतज्ञ अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात ५ आॅगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. ६ तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनच्या स्थितीत काही प्रमाणात सुधार येऊ शकतो. हवामानाची सक्रिय स्थिती सध्या उत्तर प्रदेशात कार्यरत आहे, तर मान्सूनचा अक्ष उत्तर भारतात सक्रिय आहे.

टॅग्स :Waterपाणी