शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राज्यात ३३ टक्के जंगलाची प्रतीक्षा; वनमहोत्सवाला प्रारंभ

By गणेश वासनिक | Updated: July 1, 2023 19:41 IST

निधीअभावी वृक्षारोपण मोहीम थंडावली, शासनाच्या ४८ विभागांना वृक्ष लागवडीचे टार्गेट नाही

गणेश वासनिक / अमरावती

अमरावती : ५० कोटी वृक्ष लागवडीनंतर सलग तिसऱ्या वर्षी वृक्षारोपण मोहिमेला ब्रेक लागला आहे. यंदा वनखात्याला वृक्षारोपणाचे कोणतेही टार्गेट नसल्याने याचा परिणाम जंगलवाढीवर होणार असून, राज्यात ३३ टक्के जंगलाचे ध्येय गाठणे तूर्तास कठीण झाले आहे. १५ जूनपासून वनमहोत्सवास प्रारंभ झाला असला, तरी मान्सून लांबल्याचा परिणाम वृक्ष लागवडीवर होणार आहे.

सन २०१९ मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सलग पाच वर्षे वृक्ष लागवड करण्यासाठी टार्गेट दिले होते. जगाच्या पातळीवर ५० कोटी वृक्ष लागवडीची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील जंगलाचे प्रमाण १४ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर पोहोचले. आणखी पाच वर्षे ही मोहीम सुरू राहिली असती, तर राज्यातील जंगलाचे प्रमाण हे नक्कीच २५ टक्क्यांवर गेले असते. मात्र, या चळवळीला खीळ बसलेली दिसून येत आहे. वनविभागाला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वृक्ष लागवडीसाठी निधी मिळाला नसल्याने, सामाजिक वनीकरण, वनविभाग वगळता अन्य कोणताही विभाग वृक्ष लागवडीसाठी पुढे येणार नाही, हे वास्तव आहे.

वृक्षारोपणासाठी ४८ विभाग थंडबस्त्यात

१५ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी वनमहोत्सव म्हणून शासनाने जाहीर केला आहे, परंतु राज्यातील वनविभाग वगळता, अन्य ४८ विभाग व महामंडळे वृक्ष लागवडीमध्ये थंड बस्त्यात दिसून येत आहेत. वृक्षारोपण मोहीम अनिवार्य करायची असेल, तर शासनाने परिपत्रक काढून आदेश देणे गरजेचे आहे. महसूल व वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर यांनी २८ जून राेजी विभाग, सामाजिक वनीकरणास एका आदेशाद्वारे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे, परंतु यात शासनाने विविध विभाग, महामंडळांना वगळले आहे.

मराठवाडा, खान्देश माघारला

राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडची फलश्रृती विदर्भ, कोकणमध्ये दिसून आली. कारण ५ टक्के जे जंगल वाढले, ते विदर्भ व कोकणात, असा अहवाल २०२१ मध्ये वनविभागाने सादर केला, तर मराठवाडा व खान्देशमध्ये केवळ ०.५ टक्के जंगल वाढले. जंगलवाढीसाठी मराठवाड्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राज्याची लोकसंख्या १७ कोटींवर पोहोचली आहे. त्या तुलनेत जंगल हे १७ टक्के असून, त्यात विदर्भात १३ टक्के आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती