शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

राज्यात ३३ टक्के जंगलाची प्रतीक्षा; वनमहोत्सवाला प्रारंभ

By गणेश वासनिक | Updated: July 1, 2023 19:41 IST

निधीअभावी वृक्षारोपण मोहीम थंडावली, शासनाच्या ४८ विभागांना वृक्ष लागवडीचे टार्गेट नाही

गणेश वासनिक / अमरावती

अमरावती : ५० कोटी वृक्ष लागवडीनंतर सलग तिसऱ्या वर्षी वृक्षारोपण मोहिमेला ब्रेक लागला आहे. यंदा वनखात्याला वृक्षारोपणाचे कोणतेही टार्गेट नसल्याने याचा परिणाम जंगलवाढीवर होणार असून, राज्यात ३३ टक्के जंगलाचे ध्येय गाठणे तूर्तास कठीण झाले आहे. १५ जूनपासून वनमहोत्सवास प्रारंभ झाला असला, तरी मान्सून लांबल्याचा परिणाम वृक्ष लागवडीवर होणार आहे.

सन २०१९ मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सलग पाच वर्षे वृक्ष लागवड करण्यासाठी टार्गेट दिले होते. जगाच्या पातळीवर ५० कोटी वृक्ष लागवडीची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील जंगलाचे प्रमाण १४ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर पोहोचले. आणखी पाच वर्षे ही मोहीम सुरू राहिली असती, तर राज्यातील जंगलाचे प्रमाण हे नक्कीच २५ टक्क्यांवर गेले असते. मात्र, या चळवळीला खीळ बसलेली दिसून येत आहे. वनविभागाला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वृक्ष लागवडीसाठी निधी मिळाला नसल्याने, सामाजिक वनीकरण, वनविभाग वगळता अन्य कोणताही विभाग वृक्ष लागवडीसाठी पुढे येणार नाही, हे वास्तव आहे.

वृक्षारोपणासाठी ४८ विभाग थंडबस्त्यात

१५ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी वनमहोत्सव म्हणून शासनाने जाहीर केला आहे, परंतु राज्यातील वनविभाग वगळता, अन्य ४८ विभाग व महामंडळे वृक्ष लागवडीमध्ये थंड बस्त्यात दिसून येत आहेत. वृक्षारोपण मोहीम अनिवार्य करायची असेल, तर शासनाने परिपत्रक काढून आदेश देणे गरजेचे आहे. महसूल व वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर यांनी २८ जून राेजी विभाग, सामाजिक वनीकरणास एका आदेशाद्वारे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे, परंतु यात शासनाने विविध विभाग, महामंडळांना वगळले आहे.

मराठवाडा, खान्देश माघारला

राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडची फलश्रृती विदर्भ, कोकणमध्ये दिसून आली. कारण ५ टक्के जे जंगल वाढले, ते विदर्भ व कोकणात, असा अहवाल २०२१ मध्ये वनविभागाने सादर केला, तर मराठवाडा व खान्देशमध्ये केवळ ०.५ टक्के जंगल वाढले. जंगलवाढीसाठी मराठवाड्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राज्याची लोकसंख्या १७ कोटींवर पोहोचली आहे. त्या तुलनेत जंगल हे १७ टक्के असून, त्यात विदर्भात १३ टक्के आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती