शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

मेळघाटातून रेफर झालेल्या ३३ गंभीर बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू

By उज्वल भालेकर | Updated: February 22, 2023 12:11 IST

दहा महिन्यात डफरीन येथे ३३० माता, १२९ गंभीर बालके उपचारासाठी झाले होते दाखल

अमरावती : मेळघाटातआरोग्याच्या अपुऱ्या सोयी- सुविधेमुळे येथील गंभीर गरोदर व स्तनदा माता तसेच शून्य ते एक महिन्याच्या बालकांना उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे दाखल केल्या जाते. दहा महिन्यांमध्ये मेळघाटातून दाखल झालेल्या ३३ गंभीर बालक तर एका स्तनदा मातेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर १४ गंभीर गरोदार मातांनी मृत बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरातील डफरीन रुग्णालय हे जिल्ह्यातील इतर सर्वच रुग्णालयाचे रेफर सेंटर आहे. ग्रामीण भागात अपुऱ्या सोयी- सुविधेमुळे गरोदर माता, स्तनदा माता तसेच गंभीर बालकांना याच रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्या जाते. यामध्ये सर्वाधिक रेफरचे प्रमाण हे मेळघाटातील आहे. मेळघाटातील आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधेमुळे येथे बाल मृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मेळघाटातील बालमृत्यू हा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

येथील बालमृत्यू थांबविण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार आरोग्य प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही राबविण्यात येतात; परंतु, आजही याठिकाणी आरोग्याच्या सुविधा कमी असल्याने माता व बालकांना डफरीन रुग्णालयातच रेफर केले जाते. १ एप्रिल २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये मेळघाटातून २३४ गरोदर माता, ९६ स्तनदा माता तर शून्य ते एक महिन्याच्या १२९ बालकांना डफरीन रुग्णालयात रेफर करण्यात आले होते.

नागपूरला रेफर केलेल्या चार बालकांचा मृत्यू

दहा महिन्यात मेळघाटातून डफरीन रुग्णालयात दाखल झालेल्या काही गंभीर रुग्णांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. यामध्ये ३३ गरोदर माता, १३ स्तनदा माता तर २२ शून्य ते एक महिन्यांचा बालकांचा समावेश आहे. यातील चार बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून १२ बालकांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सहा बालकांच्या कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती डफरीन रुग्णालय प्रशासनाने दिली.

१४ बालकांचा उपजत मृत्यू

दहा महिन्यात मेळघाटातील २३४ गंभीर गरोदर मातांना डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील १४ गरोदर मातांच्या बाळाची उपजत मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालय प्रशासनाकडे आहे.

आरोग्यमंत्र्याचे विशेष मॉडेल आहे कुठे?

मेळघाटातील माता मृत्यू व बालमृत्यू थांबविण्यासाठी मेळघाटला विशेष बाब म्हणून आरोग्य सुविधा पुरविण्याचे तसेच मेळघाटातील आरोग्य सुविधा वाढवून विशेष मॉडेल राबविणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मेळघाट दौऱ्यात म्हटले होते. पंधरा दिवसात हे मॉडेल कार्यान्वित होणार असल्याचे ते म्हणाले होते; परंतु, तीन महिन्यानंतरही मेळघाटला आरोग्यमंत्र्याच्या विशेष मॉडेलची प्रतीक्षा आहे.

मेळघाटातून रेफर करण्यात आलेला प्रत्येक बाळ आणि माता यांची प्रकृती ही गंभीर स्थितीमध्ये पोहाेचलेली असते; परंतु, अशाही परिस्थितीमध्ये माता आणि बाळ दोघांचेही प्राण वाचविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर सर्व प्रयत्न करतात. जर रुग्णालयातही काही सुविधा अपुऱ्या पडल्यास त्यांना तातडीने नागपूरला रेफर केल्या जाते.

- डॉ. विद्या वाठोडकर, वैद्यकीय अधीक्षक

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलMelghatमेळघाटAmravatiअमरावती