शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

By गणेश वासनिक | Updated: June 20, 2023 14:25 IST

गोड्या पाण्याच्या वापरात ६.३ टक्के झाली कपात; रेल्वे ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसण्यासाठी पाण्याचा वापर

अमरावती : मध्य रेल्वेने सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे उभारली आहे. यात दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे वाढत्या जलसंकटावर शाश्वत उपाय म्हणून हे केंद्र उपयाेगी ठरत आहेत. तसेच प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे यासह स्वच्छतेसाठी वापरले जाते.

मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि घर-संरक्षण व्यवस्थापन विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचा पाण्याचा पुर्नवापर हा पिण्यायोग्य कारणांसाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी केला जात नाही, ही बाब रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

मध्य रेल्वेत सन २०२२ मध्ये १५७५ किलोलिटर प्रतिदिन केएलडी पाणी तयार करण्याच्या क्षमतेसह १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जलसंधारणाच्या या व्यापक उपाययोजनांमुळे मध्य रेल्वेने ताज्या पाण्याच्या वापरामध्ये ६.३ टक्क्याची ची घट नोंदवली आहे. संपूर्ण झोनमधील प्रमुख उपभोग केंद्रांवर जल लेखापरीक्षण आणि बचत प्रक्षेपणांद्वारे जलसंपत्तीचे संरक्षण करण्यात पुढे असल्याचे भुसावळ येथील रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

येथे बसविण्यात आले जलशुद्धिकरण केंद्र• लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २ वॉटर रिसायकलिंग प्लांट• अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र• नाशिक रोड येथे २०० केएलडी क्षमतेचे केंद्र• अकोला येथे ५०० केएलडी क्षमता• खांडवा येथे ५०० केएलडी क्षमता• कोपरगाव येथे १५ केएलडी क्षमता• सोलापूर येथे १५ केएलडी क्षमता• अजनी, नागपूर येथे ४० केएलडी क्षमता• साईनगर शिर्डी येथे १५ केएलडी क्षमतेचा प्रकल्प

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWaterपाणी