शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

By गणेश वासनिक | Updated: June 20, 2023 14:25 IST

गोड्या पाण्याच्या वापरात ६.३ टक्के झाली कपात; रेल्वे ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसण्यासाठी पाण्याचा वापर

अमरावती : मध्य रेल्वेने सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे उभारली आहे. यात दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे वाढत्या जलसंकटावर शाश्वत उपाय म्हणून हे केंद्र उपयाेगी ठरत आहेत. तसेच प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे यासह स्वच्छतेसाठी वापरले जाते.

मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि घर-संरक्षण व्यवस्थापन विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचा पाण्याचा पुर्नवापर हा पिण्यायोग्य कारणांसाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी केला जात नाही, ही बाब रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

मध्य रेल्वेत सन २०२२ मध्ये १५७५ किलोलिटर प्रतिदिन केएलडी पाणी तयार करण्याच्या क्षमतेसह १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जलसंधारणाच्या या व्यापक उपाययोजनांमुळे मध्य रेल्वेने ताज्या पाण्याच्या वापरामध्ये ६.३ टक्क्याची ची घट नोंदवली आहे. संपूर्ण झोनमधील प्रमुख उपभोग केंद्रांवर जल लेखापरीक्षण आणि बचत प्रक्षेपणांद्वारे जलसंपत्तीचे संरक्षण करण्यात पुढे असल्याचे भुसावळ येथील रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

येथे बसविण्यात आले जलशुद्धिकरण केंद्र• लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २ वॉटर रिसायकलिंग प्लांट• अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र• नाशिक रोड येथे २०० केएलडी क्षमतेचे केंद्र• अकोला येथे ५०० केएलडी क्षमता• खांडवा येथे ५०० केएलडी क्षमता• कोपरगाव येथे १५ केएलडी क्षमता• सोलापूर येथे १५ केएलडी क्षमता• अजनी, नागपूर येथे ४० केएलडी क्षमता• साईनगर शिर्डी येथे १५ केएलडी क्षमतेचा प्रकल्प

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWaterपाणी