शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:31 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे.

ठळक मुद्देटंचाईची दाहकता वाढली : एक लाख नागरिकांची भागवितात ५४ टँकर तहान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे. प्रशासनाने यंदा कृती आराखड्यात १९३८ उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यापैकी ३३० पूर्ण झालेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावानेच जलसंकट वाढले असल्याचा आरोप होत आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली. गावागावांतील जलस्त्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारा ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे, तर ५५ गावांमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अमरावती तालुक्यातील बोडना, परसोडा, डिगरगव्हाण, मोर्शी तालुक्यात शिरखेड, अंबाडा, सावरखेड, लेहगाव, वाघोली, आसोना, पोरगव्हाण, पिंपळखुटा (मोठा) शहापूर, दहसूर, गोराळा, आखतवाडा चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्वर, जळका जगताप, सालोरा, कारला, सावंगी मग्रापूर, निमला, आमदोरी, धामणगाव रेल्वे तालुक्यात उसळगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, भारवाडी, गुरूदेवनगर, मोझरी, वरखेड, तारखेड, सार्सी, चिखलदरा तालुक्यात भंग, आडनदी, भिलखेड, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, सोनापूर, पिपादरी, कोरडा हनुमान, ढाना, कोरडा गवळी, भादरी, तारूबांदा, लवादा, भांद्री, कुलगंना, घौलखेडा बाजार, धारणी तालुक्यात ढोमणाढाणा, बुलूमगव्हाण, मलकापूर, खिरपाणी, खडीमल, सोमवारखेडा, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी येथे सद्यस्थितीत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील आठवड्यात ४९ टँकर सुरू होते. मात्र, टंचार्ईची तीव्रता वाढल्याने एका आठवड्यात ५ टँकर वाढले आहेत. गतवर्षी अधिकतम १४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या व्ही.आर. उगले, हरीश खरबडकर यांनी दिली.उर्ध्व वर्धा प्रकल्पात १४ टक्केच साठायंदा जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत सद्यस्थितीत १४० दलघमी (१४ टक्केच) साठा आहे. गतवर्षी याच दिनांकाला २७५ दलघमी म्हणजेच २८ टक्के साठा शिल्लक होता. सन २०१४ मध्ये २१०, सन २०१५ मध्ये १७०, सन २०१६ मध्ये १२०, तर सन २०१७ मध्ये २१४ दलघमी साठा शिल्लक होता. यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्याने ही स्थिती ओढावली आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातदेखील कमी पाऊस झाल्याने एकमेव मुख्य प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्या १४ टक्केच साठा शिल्लक आहे.तालुकानिहाय खासगी विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचार्ईवर तात्पुरता ईलाज म्हणजे खासगी विहिरींचे अधिग्रहण, जिल्ह्यात सद्यस्थितीत २५५ गावांमध्ये ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वाधिक ५७ विहिरी चांदूर रेल्वे तालुक्यात आहेत. अमरावती ४५, नांदगाव खंडेश्वर ३२, भातकुली १, तिवसा २०, मोर्शी ४६, वरूड ३४, धामणगाव रेल्वे १२, अचलपूर ३०, चांदूरबाजार ८, चिखलदरा १०, धारणी १२ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई