शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

२५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:31 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे.

ठळक मुद्देटंचाईची दाहकता वाढली : एक लाख नागरिकांची भागवितात ५४ टँकर तहान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली जात आहे. प्रशासनाने यंदा कृती आराखड्यात १९३८ उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यापैकी ३३० पूर्ण झालेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावानेच जलसंकट वाढले असल्याचा आरोप होत आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली. गावागावांतील जलस्त्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारा ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे, तर ५५ गावांमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अमरावती तालुक्यातील बोडना, परसोडा, डिगरगव्हाण, मोर्शी तालुक्यात शिरखेड, अंबाडा, सावरखेड, लेहगाव, वाघोली, आसोना, पोरगव्हाण, पिंपळखुटा (मोठा) शहापूर, दहसूर, गोराळा, आखतवाडा चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्वर, जळका जगताप, सालोरा, कारला, सावंगी मग्रापूर, निमला, आमदोरी, धामणगाव रेल्वे तालुक्यात उसळगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, भारवाडी, गुरूदेवनगर, मोझरी, वरखेड, तारखेड, सार्सी, चिखलदरा तालुक्यात भंग, आडनदी, भिलखेड, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, सोनापूर, पिपादरी, कोरडा हनुमान, ढाना, कोरडा गवळी, भादरी, तारूबांदा, लवादा, भांद्री, कुलगंना, घौलखेडा बाजार, धारणी तालुक्यात ढोमणाढाणा, बुलूमगव्हाण, मलकापूर, खिरपाणी, खडीमल, सोमवारखेडा, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी येथे सद्यस्थितीत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील आठवड्यात ४९ टँकर सुरू होते. मात्र, टंचार्ईची तीव्रता वाढल्याने एका आठवड्यात ५ टँकर वाढले आहेत. गतवर्षी अधिकतम १४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या व्ही.आर. उगले, हरीश खरबडकर यांनी दिली.उर्ध्व वर्धा प्रकल्पात १४ टक्केच साठायंदा जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत सद्यस्थितीत १४० दलघमी (१४ टक्केच) साठा आहे. गतवर्षी याच दिनांकाला २७५ दलघमी म्हणजेच २८ टक्के साठा शिल्लक होता. सन २०१४ मध्ये २१०, सन २०१५ मध्ये १७०, सन २०१६ मध्ये १२०, तर सन २०१७ मध्ये २१४ दलघमी साठा शिल्लक होता. यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्याने ही स्थिती ओढावली आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातदेखील कमी पाऊस झाल्याने एकमेव मुख्य प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्या १४ टक्केच साठा शिल्लक आहे.तालुकानिहाय खासगी विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचार्ईवर तात्पुरता ईलाज म्हणजे खासगी विहिरींचे अधिग्रहण, जिल्ह्यात सद्यस्थितीत २५५ गावांमध्ये ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वाधिक ५७ विहिरी चांदूर रेल्वे तालुक्यात आहेत. अमरावती ४५, नांदगाव खंडेश्वर ३२, भातकुली १, तिवसा २०, मोर्शी ४६, वरूड ३४, धामणगाव रेल्वे १२, अचलपूर ३०, चांदूरबाजार ८, चिखलदरा १०, धारणी १२ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई