शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

कपाशीच्या विम्यात ३१ मंडळांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:30 PM

बाधित कपाशीला हेक्टरी आठ हजारांची विमाभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी २२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात केली. शासनघोषणेनुसार जिल्ह्यात १८.८८ कोटींची भरपाई मिळायला पाहिजे; मात्र या आठवड्याअखेर फक्त ९.११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे.

ठळक मुद्देशासन घोषणेचे तीनतेरा : १८ ऐवजी नऊ कोटींची भरपाई, कंपन्या जुमानेना

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाधित कपाशीला हेक्टरी आठ हजारांची विमाभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी २२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात केली. शासनघोषणेनुसार जिल्ह्यात १८.८८ कोटींची भरपाई मिळायला पाहिजे; मात्र या आठवड्याअखेर फक्त ९.११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. यामध्ये ३१ महसूल मंडळांना वगळण्यात आल्याने विमा कंपन्या शासनाला जुमानत नाहीत अन् शासन केवळ वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याचे वास्तव आहे.गतवर्षीच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे १,९१,१७२ हेक्टरमधील जिरायती व बागायती कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाले. जिल्ह्यात कपाशीच्या एकूण २,०७,४५७ हेक्टर पेरणीक्षेत्रापैकी १८ हजार ८४० शेतकºयांनी २३,६०१ हेक्टरचा विमा काढला. यासाठी ४.७२ कोटींचा विमा भरणा करण्यात आला. सद्यस्थितीत यापैकी १०,९९४ शेतकऱ्यांना ९,११,४९,८३५ रुपये भरपाई कंपनीद्वारा परपरस्परच बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये ४७ मंडळांत भरपाई मिळाली, तर ३१ महसूल मंडळ सद्यस्थितीत वगळण्यात आल्याचे स्पष्ट आहे.अचलपूर तालुक्यातील सहा मंडळांमध्ये १,४९९ शेतकºयांना १,६२,३८,९५३ रुपये, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पाच मंडळात १,५६० शेतकºयांना १,७३,३७,७६७, चांदूर बाजार तालुक्यातील पाच मंडळात १,७२१ शेतकºयांना ५८,९८,६९७, चिखलदरा तालुक्यात तीन मंडळात ५५ शेतकºयांना २,७७,७८६, दर्यापूर तालुक्यात एका मंडळात ५०८ शेतकºयांना २०,६१,५९९, धामणगाव रेल्वे तालुक्यात सहा मंडळात १,२०६ शेतकºयांना ८०,९६,६५४, मोर्शी तालुक्यात सात मंडळात १,५५५ शेतकºयांना १,६७,६५,१५२, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९७९ शेतकºयांना १,०८,९४,८५१, तिवसा तालुक्यातील पाच मंडळांत १,२७,३१,३२६ व वरूड तालुक्यातील दोन महसूल मंडळांत ३५७ शेतकºयांना ८,४७,०५१ रूपयांचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. विमा भरपाई न मिळालेल्या शासन मदत केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.या महसूल मंडळात विमाभरपाई निरंकमागच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कपाशीसाठी विमाभरपाई जमा करण्यात आली. सध्या ७९ पैकी ४८ मंडळात भरपाई देण्यात आली. उर्वरित ३१ मध्ये अमरावती व भातकुली तालुक्यात निरंक आहे. याशिवाय अंजनगाव तालुक्यात भंडारज, चांदूर बाजार तालुक्यात करजगाव, शिरजगाव कसबा, चिखलदरा तालुक्यात चुरर्णी, सेमाडोह, दर्यापूर तालुक्यात दर्यापूर, रामतीर्थ, सामदा, थिलोरी, वडनेरगंगाई व येवदा, धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर व वरूड तालुक्यात पुसला, राजुराबाजार, शेंदूरजना घाट, वरूड व वाठोडा महसूल मंडळात वाटप निरंक आहे.अशी मिळाली पीकनिहाय भरपाईजिल्ह्यात सद्यस्थितीत ४२,९०४ शेतकऱ्यांना ६० कोटी ८७ लाखांची भरपाई देण्यात आली. उडिदासाठी ४,०६५ शेतकºयांना ४.५८ कोटी, मुगासाठी ६,६८१ शेतकºयांना ७.५७ कोटी व सोयाबीनसाठी २१,१६४ शेतकºयांना ३९.५९ कोटींची भरपाई बँक खात्यात १७ एप्रिलअखेर जमा करण्यात आली असल्याची माहिती आहे.