शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

बोदवड येथे लागलेल्या आगीत संत्रा व सागवानची ३०० झाडे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 20:13 IST

 परतवाडा ( अमरावती ) - धु-याला लावलेल्या आगीत एका शेतातील संत्र्याची २५०, तर सागवानाची ५० झाडे जळून खाक झाली. ...

 परतवाडा (अमरावती) - धु-याला लावलेल्या आगीत एका शेतातील संत्र्याची २५०, तर सागवानाची ५० झाडे जळून खाक झाली. या आगीत दोन हजार बांबू, स्प्रिंकलर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत बोदड येथील शेतक-याने शिरजगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अचलपूर तालुक्यातील बोदड येथील ऋषीकेश रामदासपंत राऊत (२७) यांच्या शेताला शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीची माहिती मिळताच त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता, त्यांच्या शेतातील संत्र्याची २५० झाडे, ५० साग वृक्ष अशी जवळपास ३०० झाडे जळाल्याचे निदर्शनास आले. ही आग बाजूलाच शेत असलेले संपतराव गणपतराव सावरकर (७५, रा. करजगाव) यांनी लावल्याची तक्रार ऋषीकेश राऊत यांनी केली आहे. या घटनेने राऊत कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेताचा धुरा पेटवताना निष्काळजीपणा केल्याने आग वाºयाच्या वेगाने पसरत गेली आणि तिने होत्याचे नव्हते केले. शेतातील विद्युत पंपाद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला. राऊत यांनी कष्टाने उभारलेली बाग क्षणार्धात नष्ट झाली. संपतराव सावरकर या शेतकºयाने धुºयाला आग लावली. त्या आगीने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत  शिरजगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. - ऋषीकेश राऊत,  शेतकरी, बोदड

टॅग्स :fireआगAmravatiअमरावती