शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

300 चिमुकलेही डेंग्यूच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:36 PM

शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे.

गणेश देशमुख

अमरावती : शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे.महापालिका आणि शासनाचा आरोग्य विभाग डेंग्यूबाधितांचा आकड्याबाबत लपवाछपवी करीत असला तरी बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने जिल्हाभरात किमान २०० ते ३०० बालकांना डेंग्यू झाला असल्याचे निरीक्षण ‘लोकमत’शी बोलताना नोंदविले आहे.बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेशी जिल्हाभरातील ९५ बालरोगतज्ज्ञ जुळले आहेत. त्यातील ६५ शहरांत आहेत. उर्वरित ग्रामीण भागात आहेत. संघटनेशी जुळलेल्या या संदस्यांशिवाय आणखी काही बालरोगतज्ज्ञ असतीलच, तर ते वेगळे. काही बालरोगतज्ज्ञांची प्रॅक्टिस ओथंबून वाहते, तर काहींची उत्तम चालते. एका बालरोगतज्ज्ञांकडे सरासरी १० डेंग्यूबाधित बालरुग्ण आले असण्याची शक्यता वर्तविली जाते. तथापि, ही आकडेवारी केवळ प्रतिबालरोगतज्ज्ञ दोन ते तीन इतकीच अधोरेखित केली तरी बालरुग्णांची ही सरासरी संख्या १९० ते २८५ इतकी होते. या सूत्रानुसार, जिल्हाभरात आतापर्यंत डेंग्यूच्या सरासरी ३०० बालरुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे गणित बालरोगतज्ज्ञांच्या जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सोनाली शिरभाते यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना मांडले.खरा आकडा किती?डेंग्यूबाबत महापालिकेची कार्यप्रणाली खासगी डॉक्टरांमध्ये भीती निर्माण करणारी आहे. डेंग्यू असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्याचे जाहीर झाले रे झाले की, लगेच महापालिका त्यांना अधिकारांचा खाक्या दाखविते. 'कुठल्या वैद्यकीय शास्त्रानुसार तुम्ही रुग्णाला डेंग्यू असल्याचे जाहीर केले?' अशा शब्दांत महापालिकेतून डॉक्टरांना नोटीस बजावण्यात येतात. ‘दुधाने पोळलेले ताकही फुंकून पितात’ याच उक्तीप्रमाणे डॉक्टर डेंग्यूबाबतचा आकडा जाहीर करताना विशेष सावधगिरी बाळगतात. दवाखाने, रुग्णालये महापालिका हद्दीतच चालवायची असल्यामुळे ती फुल्ल असली तरी 'पानी में रह के मगरमच्छ से बैर' कोण घेणार, हा विचार डॉक्टरांवर मानसिक दडपण आणतो. खरा अधिकृत आकडा त्यामुळे बाहेर येत नाही. किमान आरोग्याबाबतची माहिती गढूळ होऊ नये, स्वच्छ सत्य बाहेर यावे, यासाठी आता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे ‘तिसरे नेत्र’ डेंग्यू प्रकरणावर केंद्रित झाल्यास त्यातून प्रशासनाची लोकभिमुखता, लोकपयोगिता झळकू शकेल.