शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:38 IST

यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे.

ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात पावसाची पाठ

पावसावर तालुक्यांची मदार। आतापर्यंत बरसला केवळ २३५ मिलीमीटरलोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित होण्याचे चित्र आहे.तालुक्यातील चांदूर बाजारसह जिल्ह्यातील १०५ गावांची तहान भागवणाऱ्या पूर्णा धरणात यंदा कमी पावसामुळे मोठी तूट झाली आहे. दोन महिने लोटूनही पावसाने मुबलक प्रमाणात हजेरी न लावल्याने धरणात केवळ २४ टक्के जलसाठा उपलब्ध होऊ शकला. पूर्णा धरणातील जलसाठा पूर्णत: मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात झालेल्या पावसावर अवलंबून असतो. मात्र, मध्य प्रदेशात गेल्या पंधरवड्यात अल्प प्रमाणात पाऊस कोसळल्याने धरणाच्या पातळीत विशेष वाढ झाली नाही. धरणात आजरोजी ४४३.६५ मीटर पाण्याची पातळी आहे. मात्र, जुलैअखेर ही पाण्याची पातळी ४४७.५२ म्हणजे ५१.६३ टक्के पाहिजे. तथापि, यावर्षी जून महिन्यापासून भैसदेही येथे १४९ मिमी, तर सावलमेंढा येथे केवळ ७२ मिमी पाऊस झाला आहे.दरवर्षी मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात उशिरा पाऊस हजेरी लावत असल्याने धरणात आॅगस्ट महिन्यात पाण्याची पातळी वाढते. मात्र, यंदा ही शक्यता कठीण आहे. धरणावरील कर्मचारी दररोज सावलमेंढा व भैसदेही येथील शेतकऱ्यांकडून पावसाची आकडेवारी घेतात. मात्र, महाराष्ट्रातील बेलकुंड परिसरात दूरध्वनीची सुविधा उपलब्ध नसल्याने त्या भागातील पावसाची आकडेवारी मिळत नाही आणि त्यामुळे पाणीपातळीत अचानक वाढ होऊ लागते. पाच वर्षांपूर्वी धरणाचा साठा अचानक वाढल्याने ऐनवेळी पाणी सोडावे लागले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता.सुरक्षा बेदखलमराठवाडा भागातील एक धरणातील पाण्यात विष काळविल्याची घटना घडली होती. त्यामुळे तेथील ३० गावांचा पाणीपुरवठा बंद करावा लागला होता. त्यामुळे पूर्ण धरणाची सुरक्षासुद्धा अतिमहत्त्वाची आहे. धरणाच्या सुरक्षिततेकरिता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र ते बंद आहेत. ड्युटीवर कार्यरत कर्मचारी पूर्णत: माहिती नसणे हेदेखील धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदी