शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:38 IST

यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे.

ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात पावसाची पाठ

पावसावर तालुक्यांची मदार। आतापर्यंत बरसला केवळ २३५ मिलीमीटरलोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित होण्याचे चित्र आहे.तालुक्यातील चांदूर बाजारसह जिल्ह्यातील १०५ गावांची तहान भागवणाऱ्या पूर्णा धरणात यंदा कमी पावसामुळे मोठी तूट झाली आहे. दोन महिने लोटूनही पावसाने मुबलक प्रमाणात हजेरी न लावल्याने धरणात केवळ २४ टक्के जलसाठा उपलब्ध होऊ शकला. पूर्णा धरणातील जलसाठा पूर्णत: मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात झालेल्या पावसावर अवलंबून असतो. मात्र, मध्य प्रदेशात गेल्या पंधरवड्यात अल्प प्रमाणात पाऊस कोसळल्याने धरणाच्या पातळीत विशेष वाढ झाली नाही. धरणात आजरोजी ४४३.६५ मीटर पाण्याची पातळी आहे. मात्र, जुलैअखेर ही पाण्याची पातळी ४४७.५२ म्हणजे ५१.६३ टक्के पाहिजे. तथापि, यावर्षी जून महिन्यापासून भैसदेही येथे १४९ मिमी, तर सावलमेंढा येथे केवळ ७२ मिमी पाऊस झाला आहे.दरवर्षी मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात उशिरा पाऊस हजेरी लावत असल्याने धरणात आॅगस्ट महिन्यात पाण्याची पातळी वाढते. मात्र, यंदा ही शक्यता कठीण आहे. धरणावरील कर्मचारी दररोज सावलमेंढा व भैसदेही येथील शेतकऱ्यांकडून पावसाची आकडेवारी घेतात. मात्र, महाराष्ट्रातील बेलकुंड परिसरात दूरध्वनीची सुविधा उपलब्ध नसल्याने त्या भागातील पावसाची आकडेवारी मिळत नाही आणि त्यामुळे पाणीपातळीत अचानक वाढ होऊ लागते. पाच वर्षांपूर्वी धरणाचा साठा अचानक वाढल्याने ऐनवेळी पाणी सोडावे लागले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता.सुरक्षा बेदखलमराठवाडा भागातील एक धरणातील पाण्यात विष काळविल्याची घटना घडली होती. त्यामुळे तेथील ३० गावांचा पाणीपुरवठा बंद करावा लागला होता. त्यामुळे पूर्ण धरणाची सुरक्षासुद्धा अतिमहत्त्वाची आहे. धरणाच्या सुरक्षिततेकरिता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र ते बंद आहेत. ड्युटीवर कार्यरत कर्मचारी पूर्णत: माहिती नसणे हेदेखील धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदी