जिल्ह्यात ३ लाख १० हजारांवर घरात नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:07+5:302021-02-05T05:26:07+5:30
केंद्र शासन पुरस्कृत राज्यात जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०१४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणीव्दारे ...

जिल्ह्यात ३ लाख १० हजारांवर घरात नळजोडणी
केंद्र शासन पुरस्कृत राज्यात जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०१४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणीव्दारे दररोज प्रती लीटर किमान ५५ लीटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे ध्येय आहे. हे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुदत दिल्यानंतर योजना १८ ते ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये कामे पूर्ण करावयाची आहे. जिल्ह्याचा आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून तयार केला आहे. ज्या कुटुंबांना घरात नळाद्वारे पाणी मिळत आहे. त्यांची नोंदणी ऑनलाइन केली जात आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५६ हजार ६२१ कुटुंब आहेत. त्यातील ३ लाख १० हजार ६५३ कुटुंबांना घरांमध्ये पाणी मिळत आहे. ६८.०३ टक्के घरांमध्ये पाणी पोहोचले असून उर्वरित घरांसाठी नवीन योजना राबविण्याची गरज भासणार आहे. त्याचा आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात १ लाख ४५ हजार ९६८ घरामध्ये पाणी पोहोचले नाही त्यांना २०२४ पर्यंत पाणी देण्यात येणार आहे.
बॉक्स
ऑनलाइन नोंदणी
अमरावती जिल्ह्याचा आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ज्या कुटुंबांना घरात नळाव्दारे पाणी मिळत आहे. त्यांची नोंदणी ऑनलाइन केली जात आहे.
बॉक्स
तालुकानिहाय नळजोडणी असलेले कुटुंब
चांदूर रेल्वे १५३५०,मोशी ३०९१७,अंजनगाव सुजी २०११७,भातकुली १९९३२,तिवसा १७७६९, वरूड ३२३८७,चांदूर बाजार ३४८४८,दर्यापूर २८४७९,धानगांवर रेल्वे १८९०९,अमरावती २४३२७,नांदगाव खंडेश्वर १८२३८,चिखलदार ८६३०,अचलपूर २६४०२,आणि धारणी १४३४९ या प्रमाणे नळजोडणी झालेली आहे. तर अद्याप १४ तालुक्यात १ लाख ४५ हजार ९६८ घरांना नळ जोडणी बाकी आहे.