शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्लास्टिकबंदी झुगारल्यास २५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 10:43 PM

प्लास्टिकबंदीसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास २५ हजारांच्या दंडासह ३ महिने कारावास भोगावा लागणार आहे.

ठळक मुद्देशिक्षेचीही तरतूद : व्यापाºयांकडून सर्रास उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्लास्टिकबंदीसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास २५ हजारांच्या दंडासह ३ महिने कारावास भोगावा लागणार आहे. महापलिकेने कायद्यातील या तरतुदीबाबत जनजागृती चालविली असून त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांना ‘प्लास्टिक मुक्ती’ची शपथ देण्यात आली. मध्यंतरी व्यापक प्रमाणात ही मोहीम राबविण्यात आली. व्यापाºयांकडून ६ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. मात्र मागील आठवड्यापासून या मोहिमेला बे्रक लागल्याने प्लास्टिकबंदीचे तीनतेरा वाजले आहेत.बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर, संकलन, वाहतूक, खरेदी-विक्री व उत्पादन करणाºयांवर कारवाई करून त्यांना प्रथमत: पाच हजार रूपये दंड, तर दुसºयांदा १० हजार रूपये व तिसºयांदा २५ हजार रूपये दंड, तीन महिन्यांची शिक्षा करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या कारवाईचा पुनरूच्चार केला असून त्यासाठी झोननिहाय पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. आतापर्यंत बंदी झुगारणाºया व्यावसायिकांकडून सहा लाखांवर दंड वसूल करण्यात आला.सोबतच कचरा जाळणाºया व्यक्तीलाही पाच हजारांचा दंड महापालिकेतर्फे ठोठावण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे प्लास्टिक पिशव्या तयार करणाºया व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे दरमहा शुल्क भरणे गरजेचे राहिल. तसेच त्यांना दुकानासमोर प्लास्टिकच्या पिशव्या विकत मिळतील, असा फलक लावावा लागेल. विक्रीसाठी ठेवलेल्या पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या नसाव्यात, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. कॅरिबॅगचा वापर सर्रास सुरू आहे.

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरिबॅग वापरणाºयांकडून दंड वसूल करण्यात आला. महापालिका क्षेत्रात कारवाईची मोहीम राबविली जाईल.- नरेंद्र वानखडे,उपायुक्त, महापालिका