२५ कामगार बसद्वारे बिहारकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:01:29+5:30

या ५० आसनी बसमध्ये २५ मजूर बांधव प्रवास करीत असून बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यात त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी १३ तासांचा अवधी लागणार आहे. ना. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे मजूर बांधवांना जिल्ह्यातून बिहार राज्यात प्रवासासाठी परवानगी, आरोग्य तपासणी व इतर आवश्यक बाबीसाठी सहाय्य करण्यात आले. शहरातील चांदनी चौक स्थित सरकार ग्रुपच्या सहकार्याने मजुरांना स्वगृही रवाना करण्यात आले.

25 workers left for Bihar by bus | २५ कामगार बसद्वारे बिहारकडे रवाना

२५ कामगार बसद्वारे बिहारकडे रवाना

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकले : पालकमंत्र्यांच्याहस्ते हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले २५ मजूर बांधव रविवारी विशेष बसने बिहारकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून त्यांना रवाना केले.
यावेळी माजी नगरसेवक हमीद शद्दा, भातकुली काँग्रेस कमेटीचे मुकदरखाँ पठाण, उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आरिफ हुसैन यांच्यासह सरकार ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. या ५० आसनी बसमध्ये २५ मजूर बांधव प्रवास करीत असून बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यात त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी १३ तासांचा अवधी लागणार आहे. ना. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे मजूर बांधवांना जिल्ह्यातून बिहार राज्यात प्रवासासाठी परवानगी, आरोग्य तपासणी व इतर आवश्यक बाबीसाठी सहाय्य करण्यात आले. शहरातील चांदनी चौक स्थित सरकार ग्रुपच्या सहकार्याने मजुरांना स्वगृही रवाना करण्यात आले. प्रवासात भोजन व पाण्याची सुविध करण्यात आली आहे.
रोजगारानिमित्त हे मजूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आले होते. एकूण ३०० कामगार बांधवांना विशेष बसने येत्या काही दिवसात टप्प्या टप्प्याने उर्वरित मजुरांना रवाना करण्यात येईल.

दक्षतेचे नियम पाळून जाण्यास परवानगी
जिल्ह्यात अडकलेल्या मजूर बांधवांना स्वगृही परतण्यासाठी परवानगी प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. हे मजूर असल्यामुळे त्यांना शक्य त्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळाली.

Web Title: 25 workers left for Bihar by bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.