शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

२.५ लाख शेतकरी कर्जापासून वंचित?

By admin | Updated: April 11, 2017 00:30 IST

कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे.

कर्जमाफीच्या चर्चेचे ‘साईड इफेक्ट्स’ : बँकांची वसुली प्रभावित, १२६८ कोटी रुपये थकीतअमरावती : कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी थकबाकीदार झाल्याने यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नाही. यावर शासनाने तोडगा न काढल्यास हे सर्व शेतकरी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना मागील वर्षी खरिपाचे पीककर्जवाटप करण्यात आले. यापैकी किमान एक लाख शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे हेसर्व शेतकरी थकबाकीदार होणार आहेत. आणखी दोन महिन्यांपर्यंत याशेतकऱ्यांना मागील कर्ज भरता येते व नव्याने कर्जास पात्र होता येते. मात्र, त्यांना काही सवलतींना मुकावे लागणार आहे. यासह ३१ मार्चपूर्वी मध्यम व दीर्घमुदती कर्जाचेदेखील एक लाख ६७ हजार ४२६ शेतकरी थकबाकीदार आहेत. अशा जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी थकीत कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप कर्जापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. विधिमंडळ सभागृह ते गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता कर्जमाफी होणारच, याआशेवर शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. किंबहुना शेतमालास हमी इतकाही भाव नाही. यामुळे उत्पादनखर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्याला कर्जमाफीच्या चर्चेचे बळ मिळाल्याने बँकांची वसुली प्रभावित झाली. शेतकरी थकबाकीदार असल्याने बँका त्यांना कर्ज देण्यास उघडपणे नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन लाखांवर शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अकोल्यात तोडगा, जिल्ह्यात केव्हा ?अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या व्याजाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप कर्जाचे वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला व त्याला मान्यता मिळाली. जिल्ह्यातदेखील जिल्हा सहकारी बँकेने याच निर्णयाचा कित्ता गिरवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागीलवर्षीपेक्षा २०४.६८ कोटींनी लक्ष्यांक कमीजिल्ह्यात यंदाच्या खरीप व रबी कर्जवाटपासाठी १९४१ कोटींचा लक्ष्यांक आहे. मागील वर्षी २१४५.६८ कोटींचा लक्ष्यांक होता. त्यातुलनेत यंदा २०४.६८ कोटींचा लक्ष्यांक कमी आहे. वास्तविक दरवर्षी लक्ष्यांकात किमान १० टक्के वाढ गृहित धरली जाते. यंदा मात्र शेतकऱ्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने कर्जवाटपाच्या सुरुवातीलाच बँकांनी नन्नाचा पाढा वाचल्याने लक्ष्यांक कमी केल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जासाठी अडचणी उद्भवणार आहेत. यासाठी वरिष्ठ स्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल. ३१ मेपूर्वी कर्जवाटपाच्या सूचना आहेत.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक