शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

२.५ लाख शेतकरी कर्जापासून वंचित?

By admin | Updated: April 11, 2017 00:30 IST

कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे.

कर्जमाफीच्या चर्चेचे ‘साईड इफेक्ट्स’ : बँकांची वसुली प्रभावित, १२६८ कोटी रुपये थकीतअमरावती : कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी थकबाकीदार झाल्याने यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नाही. यावर शासनाने तोडगा न काढल्यास हे सर्व शेतकरी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना मागील वर्षी खरिपाचे पीककर्जवाटप करण्यात आले. यापैकी किमान एक लाख शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे हेसर्व शेतकरी थकबाकीदार होणार आहेत. आणखी दोन महिन्यांपर्यंत याशेतकऱ्यांना मागील कर्ज भरता येते व नव्याने कर्जास पात्र होता येते. मात्र, त्यांना काही सवलतींना मुकावे लागणार आहे. यासह ३१ मार्चपूर्वी मध्यम व दीर्घमुदती कर्जाचेदेखील एक लाख ६७ हजार ४२६ शेतकरी थकबाकीदार आहेत. अशा जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी थकीत कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप कर्जापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. विधिमंडळ सभागृह ते गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता कर्जमाफी होणारच, याआशेवर शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. किंबहुना शेतमालास हमी इतकाही भाव नाही. यामुळे उत्पादनखर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्याला कर्जमाफीच्या चर्चेचे बळ मिळाल्याने बँकांची वसुली प्रभावित झाली. शेतकरी थकबाकीदार असल्याने बँका त्यांना कर्ज देण्यास उघडपणे नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन लाखांवर शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अकोल्यात तोडगा, जिल्ह्यात केव्हा ?अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या व्याजाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप कर्जाचे वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला व त्याला मान्यता मिळाली. जिल्ह्यातदेखील जिल्हा सहकारी बँकेने याच निर्णयाचा कित्ता गिरवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागीलवर्षीपेक्षा २०४.६८ कोटींनी लक्ष्यांक कमीजिल्ह्यात यंदाच्या खरीप व रबी कर्जवाटपासाठी १९४१ कोटींचा लक्ष्यांक आहे. मागील वर्षी २१४५.६८ कोटींचा लक्ष्यांक होता. त्यातुलनेत यंदा २०४.६८ कोटींचा लक्ष्यांक कमी आहे. वास्तविक दरवर्षी लक्ष्यांकात किमान १० टक्के वाढ गृहित धरली जाते. यंदा मात्र शेतकऱ्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने कर्जवाटपाच्या सुरुवातीलाच बँकांनी नन्नाचा पाढा वाचल्याने लक्ष्यांक कमी केल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जासाठी अडचणी उद्भवणार आहेत. यासाठी वरिष्ठ स्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल. ३१ मेपूर्वी कर्जवाटपाच्या सूचना आहेत.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक