शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

२.५ लाख शेतकरी कर्जापासून वंचित?

By admin | Updated: April 11, 2017 00:30 IST

कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे.

कर्जमाफीच्या चर्चेचे ‘साईड इफेक्ट्स’ : बँकांची वसुली प्रभावित, १२६८ कोटी रुपये थकीतअमरावती : कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी थकबाकीदार झाल्याने यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नाही. यावर शासनाने तोडगा न काढल्यास हे सर्व शेतकरी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना मागील वर्षी खरिपाचे पीककर्जवाटप करण्यात आले. यापैकी किमान एक लाख शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे हेसर्व शेतकरी थकबाकीदार होणार आहेत. आणखी दोन महिन्यांपर्यंत याशेतकऱ्यांना मागील कर्ज भरता येते व नव्याने कर्जास पात्र होता येते. मात्र, त्यांना काही सवलतींना मुकावे लागणार आहे. यासह ३१ मार्चपूर्वी मध्यम व दीर्घमुदती कर्जाचेदेखील एक लाख ६७ हजार ४२६ शेतकरी थकबाकीदार आहेत. अशा जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी थकीत कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप कर्जापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. विधिमंडळ सभागृह ते गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता कर्जमाफी होणारच, याआशेवर शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. किंबहुना शेतमालास हमी इतकाही भाव नाही. यामुळे उत्पादनखर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्याला कर्जमाफीच्या चर्चेचे बळ मिळाल्याने बँकांची वसुली प्रभावित झाली. शेतकरी थकबाकीदार असल्याने बँका त्यांना कर्ज देण्यास उघडपणे नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन लाखांवर शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अकोल्यात तोडगा, जिल्ह्यात केव्हा ?अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या व्याजाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप कर्जाचे वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला व त्याला मान्यता मिळाली. जिल्ह्यातदेखील जिल्हा सहकारी बँकेने याच निर्णयाचा कित्ता गिरवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागीलवर्षीपेक्षा २०४.६८ कोटींनी लक्ष्यांक कमीजिल्ह्यात यंदाच्या खरीप व रबी कर्जवाटपासाठी १९४१ कोटींचा लक्ष्यांक आहे. मागील वर्षी २१४५.६८ कोटींचा लक्ष्यांक होता. त्यातुलनेत यंदा २०४.६८ कोटींचा लक्ष्यांक कमी आहे. वास्तविक दरवर्षी लक्ष्यांकात किमान १० टक्के वाढ गृहित धरली जाते. यंदा मात्र शेतकऱ्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने कर्जवाटपाच्या सुरुवातीलाच बँकांनी नन्नाचा पाढा वाचल्याने लक्ष्यांक कमी केल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जासाठी अडचणी उद्भवणार आहेत. यासाठी वरिष्ठ स्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल. ३१ मेपूर्वी कर्जवाटपाच्या सूचना आहेत.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक