शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कुपोषणमुक्तीच्या नावे 'महान'ने बळकावले अडीच कोटी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अहवाल

By उज्वल भालेकर | Updated: July 4, 2023 12:22 IST

मेळघाटातील 'त्या' ३० गावांमघ्ये माता-बालमृत्यू कायम

अमरावती : मेळघाटातील कुपोषण व माता मृत्यू रोखण्यासाठी मेळघाटात कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या महान ट्रस्ट (उतावली) या संस्थेची पोलखोल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी कार्यालयानेच केली आहे. विशेष केंद्रीय साहाय्य योजनेतून २०१७-१८ मध्ये या संस्थेला मंजूर साडेचार कोटींपैकी अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. परंतु, शासनाच्या निर्देशानुसार संस्थेकडून कोणत्याही उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत.

मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, तसेच माता मृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरवर्षी कोट्यवधीचा खर्च शासनाकडून याकरिता करण्यात येते. तथापि, मेळघाटावरील कुपोषणाचा कलंक पुसला गेलेला नाही. त्यासाठी महान ट्रस्टला अविशेष केंद्रीय योजनेंतर्गत कुपोषण व माता मृत्यू रोखण्यााठी सन २०१७-१८ मध्ये साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, संस्थेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत कोणतेही दस्तावेज चौकशी समितीला आढळून आलेले नाहीत.

मेळघाटातील उपाययोजनांसाठी येणाऱ्या निधीचा वापरच झालेला नाही. एवढेच नव्हे तर संस्थेकडे मागील चार वर्षांतील प्रत्यक्षात जन्म-मृत्यू दराची माहितीही आढळून आलेली नाही. खुद्द एकात्मिक आदिवासी विकास विभागाने हा अहवाल दिला आहे. या अहवालानंतर निधी नेमका गेला कुठे, याचा शोध घेण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. आदिवासी बांधवांची कळकळ असल्याचा बागुलबुवा करत स्वत:चे सुपोषण करणाऱ्या काही संस्थांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. याप्रकाराबाबत मेळघाटातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मेळघाटातील कुपोषण व माता मृत्यू रोखण्यासाठी महान ट्रस्टला साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. यातील अडीच कोटी रुपयांपर्यंतची रक्कमही संस्थेला दिली. परंतु संस्थेकडून शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना राबविण्यात आल्या नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

- सावन कुमार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी

विशेष साहाय्य योजनेंतर्गत एकूण ३० गावांमध्ये संस्थेला उपाययोजना राबवायच्या होत्या. त्यातील काही गावांमध्ये चौकशी सुरू आहे. दोन गावांमध्ये चौकशी केली आहे, तर उर्वरित गावांची चौकशीनंतर अहवाल सादर होईल.

- अमोल मेटकर, सहायक प्रकल्प अधिकारी

चौकशी अहवालातील प्रमुख मुद्दे

- संस्थेला योजनेंतर्गत घरोघरी जाऊन समुपदेशन केल्याचे, तसेच उपाययोजना राबविल्याचे दस्तावेज संस्थेने नेमणूक केलेल्या आरोग्यदूताकडे नाही.

- चार वर्षांतील जन्म-मृत्यू दराची गावनिहाय माहिती संस्थेकडून मिळालेली नाही.

- वयोगटानुसार मृत्यूबाबत, तसेच आजारांची कारणे याबाबत दस्तावेजही संस्थेकडे नाही.

- ३३ गावांमध्ये अभ्यास केल्याचे संस्था सांगते, पण उपाययोजना राबविल्याची माहिती नाही.

- बालकांच्या पोषणयुक्त आहारासंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाची संमती घेतलेली नाही.

- वाटण्यात आलेले पोषणयुक्त आहाराची गुणवत्तेसंदर्भातही कोणतीही दस्तावेज संस्थेकडे आढळून आलेले नाही.

असा द्यायचा होता लाभ

- शून्य ते ६० महिने वयाेगटातील १००० कुपोषित बालके

- पाच वर्षांखालील ३००० आजारी बालके

- १६०० गर्भवती महिला

- १६ ते ६० वर्षे वयोगटातील १०००० नागरिक

- मेळघाटातील २० हजार बालकांवर कर्मग्राम उतावली रुग्णालयात उपचार

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटAmravatiअमरावती