शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

पश्चिम विदर्भात २२ टक्केच पीककर्ज वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 4:22 PM

सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.

ठळक मुद्देसरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

अमरावती - सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

विभागात १ जून ते २४ जुलै या कालावधीत पावसाची ३५०.३ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १९३ मिमी पाऊस पडला. ही ५७ टक्केवारी आहे. पावसाच्या १२० दिवसांपैकी ५४ दिवस पार झाले असताना ४७ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे किमान पाच लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा स्थितीत शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकांचा नन्नाचा पाढा आहे. अमरावती विभागात यंदाच्या खरिपासाठी ८५४९ कोटी ३२ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत २,५७,३७९ शेतकऱ्यांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी १९१५ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले. ही २२.४० टक्केवारी आहे.  

विभागात जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटी ६९ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,५३,२५३ शेतकरी खातेदारांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी ९६४.८७ कोटीचे वाटप करण्यात आले. ही ४१.८५ टक्केवारी आहे. यामध्येही यवतमाळ जिल्हा बँकेचे ७५ टक्के कर्जवाटप असल्याने टक्केवारी सुधारली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११ कोटींचे लक्ष्यांक असताना ९३,३४९ शेतकरी खातेदारांना ८५४.३१ कोटींचे वाटप करण्यात आले. १५.७९ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना ८३२.५८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आज तारखेपर्यंत १०,७७७ शेतकºयांना ९६.२७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही ११.५६ टक्केवारी आहे. केवळ  जिल्हा सहकारी बँकाचे कर्जवाटपाच्या वाढीव प्रमाणावर विभागाचे वाटप २२ टक्के दिसून येत आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष्यांक असणाºया राष्ट्रीयीकृत बँका  कर्जवाटपात माघारल्या आहेत. शासनाद्वारा दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना कर्जवाटपाचा आढावा घेण्याच्या सूचना असताना कर्जवाटपात दर आठवड्यात फक्त एक टक्केच सुधारणा झालेली आहे.

कर्जवाटपात वाढ व्हावी यासाठी तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये मेळावे घेण्याचे शासनादेश आहे. जिल्हा बँकांद्वारा वाटपाच्या टक्क्यात सुधारणा आहे. मात्र, व्यापारी बँका माघारल्याने त्यांनी वेग वाढविण्याची सूचना केली आहे.

- राजेंद्र दाभेराव, विभागीय सहनिबंधक

जिल्हानिहाय खरीप कर्जवाटपाची सद्यस्थिती (कोटी)

जिल्हा           लक्ष्यांक        सभासद       वाटप        टक्काअमरावती     १६८५००.००    ३३२८७      ३३२७३.११    १९.७५अकोला        १३९८७८.००    ३४७३५      ३१४०६.४३   २२.४५वाशीम         १५३०००.००     ३५०४९      २८२३८.६६   १८४६बुलडाणा      १७७३७७        ४०२०१३०   १६२२०.४०    ९.१४यवतमाळ    २१६१७६.६८    १३४१७८    ८२४०७.१०    ३८.१२एकूण          ८५४९३२.०८    २५७३६९  १९१५४५.७०  २२.४०

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीagricultureशेतीMONEYपैसा