वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत २२ हल्ले
By Admin | Updated: October 14, 2015 00:18 IST2015-10-14T00:18:43+5:302015-10-14T00:18:43+5:30
राज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची...

वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत २२ हल्ले
वनसंपदा धोक्यात : चराईमुळे होते वनौषधी नष्ट
मोहन राऊत अमरावती
राज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस रेकॉर्डमधून बाहेर आली आहे़ आम्हाला न्याय हवा, अशी मागणी वनकर्मचाऱ्यांनी केली आहे़
जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्र वगळता अमरावती वनविभागात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे़ वडाळी, मोर्शी, चांदूररेल्वे, परतवाडा व वरूड हे तालुके या क्षेत्रात आहेत़ मौल्यवान सागवान, खेर, साजड, अंजन, सालई, अन्नपूर्णा तसेच वनौषधी म्हणून बीबा, चारोळी, व अनेक वनऔषधी आहेत़ २०० प्रकारच्या पक्षाच्या प्रजाती असून वड, पिंपळ , उंबर, यावर हे पक्षी वास्तव्य करतात़ परंतू आज या पक्षांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे़
चारईत वनऔषधी होतेय नष्ट
मागील अनेक वर्षा पासून या वनक्षेत्रात चराई चे प्रकार वाढले आहेत़ चराई होत असल्यामुळे नवीन वनस्पती उगवनीचे प्रमाण पुर्णत: थांबले आहेत़
या जंगलातील वनसंपदा धोक्यात आली आहे़ मारर्व्हेल, गोंडवेल, मोतीतुरा अशा प्रकारच्या गवताच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत़ या जाती वाचविण्यासाठी प्रशासनाने आता वरिष्ठ स्तरावर पावले उचलणे गरजेचे आहे़ अन्यथा दुर्मिळ वनौषधी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.
वनकर्मचारी व अधिकारी अडचणीत
या जंगलाचे सरंक्षण करीत असतांना मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यात अनेकदा संघर्षाचे प्रकार घडले आहे़ यात वनकर्मचारी व अधिकारी यांच्यावर अधीक हल्ले झाले असल्याची माहिती पोलीस दप्तरी आहेत़या प्रशासकीय यंत्रणेलाच धारेवर धरण्याचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे़
जमा बंदी क्षेत्राचे कसे होणार रक्षण
राज्य शासनाने ४८ वनविभागात चराई जमाबंदी चे आदेश ६ मे २००८ रोजी दिलेत अमरावती जिल्ह्यातील पश्चिम मेळघाट, पूर्व मेळघाट व अमरावती वनविभागाचा समावेश आहे़ या भागातील चराई थांबणे गरजेचे आहे़ संबधीत भागाचे रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना जीव मुठीत घेवून रक्षण करण्याची पाळी आली आहे़
आम्हाला कधी मिळणार न्याय?
मागील अनेक पिढ्यांपासून मेंढ्या पाळणे आमचा व्यवसाय आहे़ त्यामुळे संसाराचा गाडा चालतोय आम्ही कोणत्याही वनक्षेत्रात मेंढ्या चारण्याचे काम करीत नसतांना आमच्यावर अनेक खोटे आरोप केल्या जाते़ खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होतो़ आम्ही जायचे तरी कुठे, आम्हाला कधी न्याय मिळणार असा सवाल अनेक मेंढपाळांनी निर्माण केला आहे़