शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

२० टक्के बस आगारातच, प्रवाशांना खासगीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST

अमरावती : अनलॉकनंतर हळूहळू एसटी महामंडळाकडून बसफेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत आहे. परंतु, अद्यापही केवळ ८० टक्के ...

अमरावती : अनलॉकनंतर हळूहळू एसटी महामंडळाकडून बसफेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत आहे. परंतु, अद्यापही केवळ ८० टक्के बस रस्त्यावर धावत असून, २० टक्के आगारातच आहेत. त्यामुळे बहुतांश प्रवाशांना खासगी वाहतुकीच्या साधनांचा वापर प्रवासासाठी करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर उर्वरित बसमधून प्रवासी वाहतूक लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी सांगितले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसची चाके थांबली होती. अशातच अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास या प्रशासनाच्या नियमामुळे प्रवासीही घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे एसटीच्या केवळ बोटावर मोजण्याइतकेच फेऱ्या सुरू होत्या. त्यानंतर अनलॉकची घोषणा होताच एसटी बस व फेऱ्यांची बस संख्या वाढविण्यात आली. अमरावती मध्यवर्ती आगारातून आजघडीला ८० टक्के बस रस्त्यावर धावत आहेत. अद्याप २० टक्के बस आगारात उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी प्रवाशांना प्रवासासाठी खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता, उर्वरित एसटी बसची वाहतूकही प्रवाशांसाठी सुरू करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत अनेक गावांमध्ये बस सुरू नसल्यामुळे खासगी वाहनांनी प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

बॉक्स

एकूण बस ६२

सध्या सुरू असलेल्या बस - ५०

आगारात उभ्या असलेल्या बस - १२

एकूण कर्मचारी -३४८

चालक -११३

वाहक -१३८

सध्या कामावर चालक - ११३

सध्या कामावर वाहक -११८

बॉक्स

या गावांना नाहीत बस

सध्या अमरावतीहून मध्य प्रदेशात होणारी वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या ६, मध्यम पल्ल्याच्या ७, सर्वसाधारण ४० बस सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिरजगाव मोझरी, वाई, साऊर, सोनोरी व अन्य काही गावांमध्ये जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या सध्या बंद आहेत. विशेष म्हणजे, शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थिनींसाठी सोडण्यात येणाऱ्याही फेऱ्या बंद आहे. त्यामुळे बंद असलेल्या बसफेऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

खासगी वाहनांचा आधार

एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे मध्य प्रदेशासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी आहे. यामुळे प्रवाशांना खासगी वाहतूक करणारी वाहने धुंडाळावी लागतात. अशातच महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली तरीदेखील एसटी बस ऐवजी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या बस शंभर टक्के रस्त्यावर येईपर्यंत प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.

कोट

एसटी महामंडळाने बस सुरू केल्या असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे कामासाठी शहरात जायचे झाल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे बंद असलेल्या बस सुरू करण्याची गरज आहे.

- दादाराव काडगळे, प्रवासी

कोट

एसटी बस बंद असल्याने खासगी वाहनाने जादा पैसे माेजून प्रवास करावा लागत आहे. त्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होते. त्यामुळे एसटी बस सुरू करण्याबाबत एसटी महामंडळाने त्वरीत निर्णय घ्यावा.

- पंजाबराव उके, प्रवासी