शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

नैसर्गिक आपत्तीचे यंदा १९ बळी; १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 19:37 IST

२,७८४ कुटुंबे बाधित

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १९ व्यक्ती नैसर्गिक आपत्तीच्या बळी ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त लहान-मोठी ५१ जनावरे दगावली. या आपत्तीमुळे २,७८४ कुटुंबे बाधित झाली, तर किमान १ लाख ९८ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ४२ हजार ८५० हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील १० तालुक्यांनी जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची सरासरी पार केली. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. यामध्ये मोठी  वित्तहानी व प्राणहानी झाली. या चार महिन्यांतील आपत्तीमध्ये जिल्ह्यात ५३० गावांमध्ये २,७८४ कुटुंबे बाधित झाली आहेत. १९ जण दगावले. यापैकी ११ जण पुरात वाहून गेले, तर आठ जणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सर्वच प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. 

चार महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने २३ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. यापैकी १४ प्रकरणांत ४.२५ लाखांची मदत देण्यात आली. १७ लहान दुधाळ जनावरे मरण पावली. यापैकी चार प्रकरणांत ६४ हजारांची मदत देण्यात आली. याव्यितिरिक्त ओढकाम करणारी सात जनावरे दगावल्याचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये २६ घरे पूर्णत: नष्ट झाली. त्यासाठी १ लाख २७ हजार ६५० रुपयांची शासन मदत देण्यात आली. ९६ घरांची अंशत: पडझड झाली. १९०७ कच्च्या घरांची पडझड झाली. यासाठी १० लाख ७५ हजार ३९४ रुपयांची शासन मदत देण्यात आली. ५७७ घरे पूर्णत: नष्ट झाली. यासाठी २ लाख ८४ हजार ९०० रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे.  शेतीपिकांचे तालुकानिहाय नुकसान

आपत्तीमध्ये अमरावती तालुक्यात ३१,९४३ हेक्टर, भातकुली तालुक्यात १६१.२५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १०५८ हेक्टर, धामणगाव रेल्वे २८,०३४ हेक्टर, चांदूर रेल्वे २०,६७९ हेक्टर, मोर्शी १९,२७७ हेक्टर, वरूड २९,९७० हेक्टर, अचलपूर ११,०६० हेक्टर, चांदूर बाजार १६१८५ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १९,३२३ हेक्टर, धारणी ११,७२९ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ९३८८ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. तिवसा व दर्यापूर तालुक्यात नुकसान निरंक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती