शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीचे यंदा १९ बळी; १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 19:37 IST

२,७८४ कुटुंबे बाधित

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १९ व्यक्ती नैसर्गिक आपत्तीच्या बळी ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त लहान-मोठी ५१ जनावरे दगावली. या आपत्तीमुळे २,७८४ कुटुंबे बाधित झाली, तर किमान १ लाख ९८ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ४२ हजार ८५० हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील १० तालुक्यांनी जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची सरासरी पार केली. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. यामध्ये मोठी  वित्तहानी व प्राणहानी झाली. या चार महिन्यांतील आपत्तीमध्ये जिल्ह्यात ५३० गावांमध्ये २,७८४ कुटुंबे बाधित झाली आहेत. १९ जण दगावले. यापैकी ११ जण पुरात वाहून गेले, तर आठ जणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सर्वच प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. 

चार महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने २३ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. यापैकी १४ प्रकरणांत ४.२५ लाखांची मदत देण्यात आली. १७ लहान दुधाळ जनावरे मरण पावली. यापैकी चार प्रकरणांत ६४ हजारांची मदत देण्यात आली. याव्यितिरिक्त ओढकाम करणारी सात जनावरे दगावल्याचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये २६ घरे पूर्णत: नष्ट झाली. त्यासाठी १ लाख २७ हजार ६५० रुपयांची शासन मदत देण्यात आली. ९६ घरांची अंशत: पडझड झाली. १९०७ कच्च्या घरांची पडझड झाली. यासाठी १० लाख ७५ हजार ३९४ रुपयांची शासन मदत देण्यात आली. ५७७ घरे पूर्णत: नष्ट झाली. यासाठी २ लाख ८४ हजार ९०० रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे.  शेतीपिकांचे तालुकानिहाय नुकसान

आपत्तीमध्ये अमरावती तालुक्यात ३१,९४३ हेक्टर, भातकुली तालुक्यात १६१.२५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १०५८ हेक्टर, धामणगाव रेल्वे २८,०३४ हेक्टर, चांदूर रेल्वे २०,६७९ हेक्टर, मोर्शी १९,२७७ हेक्टर, वरूड २९,९७० हेक्टर, अचलपूर ११,०६० हेक्टर, चांदूर बाजार १६१८५ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १९,३२३ हेक्टर, धारणी ११,७२९ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ९३८८ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. तिवसा व दर्यापूर तालुक्यात नुकसान निरंक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती