शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू; परिस्थिती आजही चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 16:12 IST

मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे. 

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची कारणे वेगवेगळी असली तरी आजही मेळघाटातील आरोग्यस्थिती चिंताजनक आहे. मागील दोन वर्षात २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या जन्मास आलेल्या बालकांची संख्या १ हजार १४२ आहे. यात धारणी तालुक्यातील ७२९, तर चिखलदरा तालुक्यातील ४१३ बालकांचा समावेश आहे.

जन्मास आलेल्या शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ५४६ मुले तीव्र कुपोषित आहेत. यातील १६३ मुले अतितीव्र कुपोषित असून, ३८३ अतिमध्यम तीव्र कुपोषित आहेत. ७९६ मुलांचे वजन कमी असून, यात अतितीव्र कमी वजनाच्या ३०२, तर मध्यम कमी वजनाच्या ४९४ बालकांचा समावेश आहे. 

मेळघाटातील ४६७ अंगणवाडी केंद्रांमधून संदर्भ सेवा व पोषण आहार पुरवित कुपोषण निर्मूलन व बालमृत्यू रोखण्याकरिता प्रयत्न आहेत. पण, अंगणवाडी केंद्राचे रेकॉर्डनुसार शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ४३४ मुले आजही अतितीव्र कुपोषीत असून, अतिमध्यम तीव्र कुपोषीत मुलांची संख्या २ हजार ८७६ आहे. यात एकूण ३ हजार ३१० मुले कुपोषित आहेत.

मेळघाटास एकूण शून्य ते सहा वर्षे वयोगटात ३६ हजार ९७ मुले आहेत. यातील धारणीत २२ हजार ३४४, तर चिखलदºयात १३ हजार ७५३ मुलांचा समावेश आहे. अंगणवाडीत यातील ३० हजार ५३१ मुलांचे वजन आणि उंची नोंदविली गेली. यात २ हजार ७२५ मुले अतितीव्र कमी वजनाची आहेत, तर ८६ मुलांना दुर्धर आजाराने ग्रासले आहे. या बालकांसोबतच ४४ लोक गलगंडने त्रस्त आहेत. मेळघाटात चिखलदरा तालुक्याच्या तुलनेत धारणी तालुक्यात कुपोषित मुलांची अधिक आहे. गतवर्षी दीड हजार प्रसूती घरीच मेळघाटात गर्भवती माता दवाखान्याऐवजी घरीच प्रसूत होत आहेत. एप्रिल १८ ते मार्च १९ दरम्यान मेळघाटात १ हजार ५७० प्रसूती घरी झाल्या आहेत. यात धारणी तालुक्यातील प्रसूतीची संख्या ९३४, तर चिखलदरा तालुक्यातील संख्या ६३६ आहे. पोषण आहारात पिवळा भातसन २०१८-१९ मध्ये मेळघाटातील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील २७ हजार ८४१ मुलांना अमृत आहार योजनेंतर्गत लाभ दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पण, प्रत्यक्षात मागील महिन्याभरापासून मेळघाटातील अनेक अंगणवाडी केंद्रात पोषण आहारांतर्गत साधा पिवळा भातच दिला जात आहे. त्यात तेल नाही, दाळ नाही, उसळ नाही. अंगणवाड्यांमधल तेल, दाळ, तांदूळसह पूरक साहित्य संपुष्टात आले आहे.

बालविकास केंद्र दुर्लक्षितबालमृत्यू रोखण्याकरिता मातेसह बालकाला आरोग्य सेवेसह अन्य सेवा पुरविणारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बालविकास केंदे्र मेळघाटात वृत्त लिहिस्तोवर सुरू झालेली नाहीत. मेळघाटातील चिखलदरासह अन्य भागांना जवळ पडणाºया अचलपूर रुग्णालयात विचाराधीन एनआरसी केंद्र अद्यापही दुर्लक्षित आहे. फिरते पथक, त्यांच्याकडील गाड्या त्यांचे सोयीच्या ठिकाणी असलेले मुक्काम आणि अ‍ॅॅम्ब्यूलन्स यावरही प्रश्न उपस्थित करून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.अँड्रॉइड अंगणवाडी; नेटवर्कची बोंबकुपोषण निर्मूलन व बालमृत्यू रोखण्याकरिता अंगणवाडीतील अभिलेख डिजिटाइज्ड करण्याकरिता मेळघाटातील ४६७ अंगणवाड्यांना अँड्राइड बेस्ड मोबाइल फोन डाटा प्लॅन सिमकार्डसह पुरविण्यात आले आहेत. पण, मेळघाटातील डोंगरदºयातील दुर्गम आदिवासी भागात मोबाइल नेटवर्क मिळत नाही. अनेक ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही. यात सर्वच त्रस्त आहेत.

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावती